शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

शेतकऱ्यांची सरकारकडून उपेक्षाच

By admin | Updated: October 10, 2016 00:38 IST

महिला बचतगटाला आत्मनिर्भर बनविण्याचे खरे कार्य सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या काळात झाले आहे.

अशोक चव्हाण यांचा आरोप : महिला बचत गट मेळावाचंद्रपूर : महिला बचतगटाला आत्मनिर्भर बनविण्याचे खरे कार्य सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या काळात झाले आहे. गटाला चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले. परंतु सत्तेवर येताच भाजप सरकारने महिला बचतगटाला सक्षमीकरण करण्याऐवजी सवलतीच्या योजना बंद करून त्यांना वेठीस धरले आहे. दुष्काळाच्या काळात कर्जमाफी दूर परंतु उत्पादित मालाही योग्य दर दिला नाही. त्यामुळे तो हवालदिल झाला आहे. त्यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे महिला व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शासनाला धडा शिकवण्याचा निर्धार करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी व महिला बचतगट मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस कमिटी सचिव प्रमोद तितरमारे, माजी आ. सुभाष धोटे, प्रदेश महासचिव झिया पटेल, प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, ज्येष्ठ नेत्या रजनी हजारे, विजया बांगडे, डॉ.आसावरी देवतळे, चंद्रपूर विधानसभा महेश मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदींची उपस्थिती होती.खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, काँग्रेसने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण घोषित करून ग्रामीण सत्तेची चाबी सोपविली आहे. त्यांना आत्मसन्मान प्रदान केला. लोकसभेतही तिचा योग्य गौरव व्हावा म्हणून आरक्षण देण्याची सोनिया गांधी यांची भूमिका आहे. आज देशात व राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहे. दुष्काळस्थितीतही त्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजपा सकारकडून होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गतवर्षी धानाला दोन हजारपेक्षाही हमीभाव दिल्याने उत्पादन खर्चही निघू शकला नसल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे.अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचत गटांना पूर्वीप्रमाणेच चार टक्के व्याज दराने सवलतीने कर्ज देण्याचे बचत गटांच्या महिलांना दिले होते. परंतु आश्वासन पाळले नसल्याने गटाला १० टक्के व्याज दर द्यावा लागत आहे. त्यामुळे महिलांचा विश्वास फडणवीस सरकारने गमावले असल्याचा आरोप खा. चव्हाण यांनी यावेळी केला.माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी निवडणुकीच्या काळात गोरगरीब व शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळता येत नसेल तर भाजपा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची टिका यावेळी केली.भाजपा सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला असल्याने सामान्यमाणसाच्या ताटातील तुरीची डाळ गायब झाली. धानाला भाव नाही. याउलट केवळ प्रस्थापित व्यवस्थेचे लाड पुरविण्यातच राज्य सरकारला स्वारस्य आहे. चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतेत सापडला आहे. या ठिकाणी ओला दुष्काळ घोषित न झाल्यास शेतकऱ्यांचे जगणे आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काँग्रेसने ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेहमीच गोरगरीब व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. भाजपा सरकारमध्ये आता स्थिती याउलट आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारे कुणी नसल्याने आता पेटून उठण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केले.प्रारंभी आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहराव पाऊणकर यांनी महिला व शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मेळाव्याला जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटाच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)