शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकरी अपघात विम्याबाबत जनजागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ...

चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर पाहिजे तशी जनजागृतीच झाली नसल्याने या योजनेपासून आजही शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तत्कालीन युती सरकारच्या काळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र गाव, वस्त्यावर या योजनेची माहितीच पोहचली नाही. योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास मृत्यू अथवा अपघातानंतर तीन महिन्यात विहीत नमुन्यात कृषी विभागाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकरी अर्ज दाखल करीत नसल्यामुळे त्यांना आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघाताचा या योजनेत समावेश आहे. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. यात अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसास दोन लाख रुपये मिळतात. यात त्याचा मुख्य व्यवसाय शेती आणि तो शेतकरी असावा, हिच एकमेव अट आहे.