शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विम्याबाबत जनजागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ...

चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर पाहिजे तशी जनजागृतीच झाली नसल्याने या योजनेपासून आजही शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तत्कालीन युती सरकारच्या काळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र गाव, वस्त्यावर या योजनेची माहितीच पोहचली नाही. योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास मृत्यू अथवा अपघातानंतर तीन महिन्यात विहीत नमुन्यात कृषी विभागाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकरी अर्ज दाखल करीत नसल्यामुळे त्यांना आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघाताचा या योजनेत समावेश आहे. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. यात अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसास दोन लाख रुपये मिळतात. यात त्याचा मुख्य व्यवसाय शेती आणि तो शेतकरी असावा, हिच एकमेव अट आहे.