शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील शेतकरी जगत आहेत दारिद्राचे जीणे !

By admin | Updated: July 23, 2016 01:44 IST

महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

सिंचनाचा अभाव : निसर्गाची अवकृपा आणि शासनाचेही लक्ष नाही राजुरा : महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीवनभर काबाडकष्ट करुनसुद्धा शेतकरी सुखी नाही. सूर्योदयापूर्वीपासून तर सूर्यास्तापर्यंत शेतात राबूनही पोटच्या पोराला शिक्षण व मुलीचे लग्न करावयाची ऐपत या भागातील शेतकऱ्यांजवळ नसल्याचे भयावह चित्र आहे. सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. ऊन, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता जीवाचे रान करुन काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील शेतकरी लिंगा सोयाम २० वर्षापासून शेती करीत आहे. काबाडकष्ट करुन, दिवसभर शेतात राबूनसुद्धा आज त्याच्या हातात काहीच शिल्लक नाही. तीन एकरामध्ये राब-राब राबत आहे. या आदिवासी शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. गरीब परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण न झाल्याची खंत मनात आहे. कापसाला भाव मिळत नाही, विक्रीसाठी बाजारपेठ नाही, फेडरेशन लवकर पैसे देत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात नगदी पैसे देणाऱ्याला कापूस विकतो. मृग नक्षत्राच्या पहिल्या सरीने शेतकरी सुखावतो. पेरणीपूर्व प्रक्रिया व पेरणी नंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर असे वाटते की, कधी कापूस निघेल, कधी विकणार, मुलामुलींचे लग्न करणार, पत्नीसाठी कपडे घेणार. परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात कधी दिवाळी नसते. केवळ अंधकारमय जीवन जगण्यासाठी शेतकऱ्यांचा जन्म झाला काय, असा सवाल लिंगा सोयाम यांनी शासन व्यवस्थेला विचारला आहे. विठोबा लांडे हासुद्धा चार एकर जमीन असलेला शेतकरी २५ वर्षापासून शेती करतो. दोन मुलांचे कसेबसे शिक्षण झाले. मुलीच्या लग्नाची चिंता मनाला भेडसावीत आहे. वाटलं कापूस होईल. पैसा मिळणार, मुलीचे लग्न उरकून टाकू, परंतु अकाली पावसामुळे मनातील आकांक्षेवर पाणी फेरले. कापूस नष्ट झाला, त्यामुळे मुलीचे लग्न करु शकत नाही. भांडवलदार व शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या भागातील पाण्याची साठवण उद्योगांना दिल्या जाते, ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या मुबलक सोई उपलब्ध होणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार नाही. राजुरा परिसरातील शेतकरी गोविंद गायकवाड तीन एकराचा मालक असलेला शेतकरी म्हणाला की, शेतकऱ्यांकडे शासनाचे लक्ष नाही. ५० वर्षापासून शेती करीत आहे. आज मायाजवळ काही नाय, राजकीय नेते व शासकीय अधिकारीच शेतकऱ्यांना लुटत आहे. राज्यातील सीमावर्ती नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)