शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सीमेवरील शेतकरी जगत आहेत दारिद्राचे जीणे !

By admin | Updated: July 23, 2016 01:44 IST

महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

सिंचनाचा अभाव : निसर्गाची अवकृपा आणि शासनाचेही लक्ष नाही राजुरा : महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीवनभर काबाडकष्ट करुनसुद्धा शेतकरी सुखी नाही. सूर्योदयापूर्वीपासून तर सूर्यास्तापर्यंत शेतात राबूनही पोटच्या पोराला शिक्षण व मुलीचे लग्न करावयाची ऐपत या भागातील शेतकऱ्यांजवळ नसल्याचे भयावह चित्र आहे. सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. ऊन, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता जीवाचे रान करुन काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील शेतकरी लिंगा सोयाम २० वर्षापासून शेती करीत आहे. काबाडकष्ट करुन, दिवसभर शेतात राबूनसुद्धा आज त्याच्या हातात काहीच शिल्लक नाही. तीन एकरामध्ये राब-राब राबत आहे. या आदिवासी शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. गरीब परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण न झाल्याची खंत मनात आहे. कापसाला भाव मिळत नाही, विक्रीसाठी बाजारपेठ नाही, फेडरेशन लवकर पैसे देत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात नगदी पैसे देणाऱ्याला कापूस विकतो. मृग नक्षत्राच्या पहिल्या सरीने शेतकरी सुखावतो. पेरणीपूर्व प्रक्रिया व पेरणी नंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर असे वाटते की, कधी कापूस निघेल, कधी विकणार, मुलामुलींचे लग्न करणार, पत्नीसाठी कपडे घेणार. परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात कधी दिवाळी नसते. केवळ अंधकारमय जीवन जगण्यासाठी शेतकऱ्यांचा जन्म झाला काय, असा सवाल लिंगा सोयाम यांनी शासन व्यवस्थेला विचारला आहे. विठोबा लांडे हासुद्धा चार एकर जमीन असलेला शेतकरी २५ वर्षापासून शेती करतो. दोन मुलांचे कसेबसे शिक्षण झाले. मुलीच्या लग्नाची चिंता मनाला भेडसावीत आहे. वाटलं कापूस होईल. पैसा मिळणार, मुलीचे लग्न उरकून टाकू, परंतु अकाली पावसामुळे मनातील आकांक्षेवर पाणी फेरले. कापूस नष्ट झाला, त्यामुळे मुलीचे लग्न करु शकत नाही. भांडवलदार व शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या भागातील पाण्याची साठवण उद्योगांना दिल्या जाते, ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या मुबलक सोई उपलब्ध होणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार नाही. राजुरा परिसरातील शेतकरी गोविंद गायकवाड तीन एकराचा मालक असलेला शेतकरी म्हणाला की, शेतकऱ्यांकडे शासनाचे लक्ष नाही. ५० वर्षापासून शेती करीत आहे. आज मायाजवळ काही नाय, राजकीय नेते व शासकीय अधिकारीच शेतकऱ्यांना लुटत आहे. राज्यातील सीमावर्ती नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)