शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

चिंचाळा व मांगली (रै.) येथील शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

तालुक्यातील चिंचाळा (रै.) व मांगली (रै.) शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे.

भद्रावती : तालुक्यातील चिंचाळा (रै.) व मांगली (रै.) शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे उभे पीक वाळले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत वीज मंडळाकडे तक्रार केली आहे. परंतु या विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी दिला आहे. १४ मार्च २०१४ पासून चिंचाळा (रै.) येथील देगवडे यांच्या शेताजवळील डिपी बंद आहे. याबाबत संबंधित लाईनमनला सूचना देण्यात आली. ट्रान्सफॉर्मर जळाले आहे नवीन बदलवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी तब्बल तीन महिने लावण्यात आले. लावण्यात आलेली डी.पी. सुद्धा कमी क्षमतेची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यानंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेला भाजीपाला, आवळ्याचे झाड, चिकू, लिंब व इतर फळ झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेली नुकसान भरपाई वीज मंडळ देणार का, असा प्रश्न शेतकरी करीत आहे.याशिवाय येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी वीज मंडळाच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता, कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट झाली नाही. भ्रमणध्वनीवरुन बोलणे झाले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज मंडळाच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी खासदार तथा आमदारांकडे तक्रार केली आहे. याबाबत आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न लावण्याचे शेतकऱ्यांना कळविले आहे. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देवून दिलासा द्यावा, अशी मागणी विजय वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)३५१ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेतचंद्रपूर : चिमूर तालुक्यात २०१० ते २०१३ या वर्षात ३५१ शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरली आहे. मात्र अद्यापही त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. ३५१ वीज कनेक्शन जोडणी बाकी असून २०१४मध्ये डिमांड भरलेल्यांची संख्या वेळगी आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीला विचारना केली असता, ज्या कंपनीला कनेक्शन जोडण्याचे काम दिले होते.ती कंपनी कामच करीत नव्हती. आता त्या कंपनीला डिफाल्टर ठरवून ए.एम.जी कंस्ट्रक्शन कंपनीला काम दिल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन जोडण्याचे काम सुरू असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात वीज जोडणी करण्यात आली नाही. २०१३- १४ मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे तर रब्बी पिकाचे गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.पेरणीच्या ऐनवेळी बी- बियाणे घ्यायची ताकत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. दुसरीकडे पाच वर्षांपासून वीज कनेक्शनसाठी डिमांड भरूनसुद्धा शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असे राष्ट्रवादी किसान सभेचे सुरेश रामगुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी वीज वितरण कंपनीसह शासनाला निवेदन देवून वीज कनेक्शन त्वरित लावून देण्याची मागणी केली आहे.