शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:10 IST

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावेळी ही जमीन भोगवटदार दोनमध्ये होती. दरम्यान, तत्कालिन तहसीदार व तलाठ्याने शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून अन्य शेतकऱ्यांसोबत ही जमीन ...

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वर्ग एकची जमीन दोनमध्ये करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावेळी ही जमीन भोगवटदार दोनमध्ये होती. दरम्यान, तत्कालिन तहसीदार व तलाठ्याने शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून अन्य शेतकऱ्यांसोबत ही जमीन वर्ग एकमध्ये करण्यात आली. पण, काही कालावधीनंतर सोनडवले यांच्याच जमिनीवर अटी लावल्या. अन्य जमीन धारकांबाबत शर्ती लावल्या नाहीत. त्यामुळे मालकी हक्कावर गदा आली आहे. वर्ग दोनचा पेरा काढावा आणि वर्ग एकमध्ये करावी, अशी मागणी सोनडवले यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला. त्याला प्रशासनच दोषी आहे. त्यामुळे सोनडवले यांनी रविवारपासून मांगली ग्रा. पं. समोर आमरण उपोषण सुरु केले. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही सोनडवले यांनी व्यक्त केला आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी, आमदार विजय वडेट्टीवार, तसेच ठाणेदारांना निवेदनाच्या प्रती देऊन शासनाने लक्ष वेधले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे जमिनीच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलले. जिवाला धोका झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असेही सोनडवले यांनी निवेदनात नमूद केले आहे.