शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

शेतकऱ्यांच्या नशिबी मातीचे ढिगारेच

By admin | Updated: February 24, 2016 00:49 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असा तरी, ...

गोसेखुर्दचा घोडाझरी उपकालवा : वनवास संपता संपेनाघनश्याम नवघडे  नागभीडगोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असा तरी, या तालुक्याला त्याचा फायदा काहीच झालेला नाही. मात्र या कालव्याच्या रुपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे या तालुक्याच्या नशिबी आले आहेत.पूर्व विदर्भातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाची ख्याती आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताही मिळाली आहे. याच प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ कि.मी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून यावर्षी आसोला मेंढा या तलावात पाणी सोडण्यात आले आणि त्याचे परिणाम यावर्षी सावलीवासीयांना दिसू लागले आहे. नागभीड तालुक्यातील घोडाझरीत पाणी सोडण्यासाठी घोडाझरी उपकालव्याचे नियोजन करण्यात आले. सहा-सात वर्षांपूर्वी या उपकालव्याचे कामही सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवटच आहे. नागभीड तालुक्यातून हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला असून कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी मातीचे डोंगर तयार करण्यात आले आहेत. शेतात मातीचे डोंगर तयार झाल्याने शेकडो एकर जमीन नापिकी झाली आहे. एवढेच नव्हे तर या अर्धवट कालव्याच्या रुपाने शासनाने या तालुक्यातील लोकांसाठी मृत्यूचे दरवाजे उघडून दिले आहेत. गेल्या तीन चार वर्षात तालुक्यातील नवेगाव पांडव आणि मौशी येथे घडलेल्या घटनांनी हे सिद्ध होते.असे असूनही नागभीड तालुक्याला या कालव्याचा म्हणा किंवा प्रकल्पाचा म्हणा फायदा काय, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर शुन्य असेच देता येईल. मौशीपासून तर बाळापूरपर्यंत ४२ गावे या प्रकल्पाच्या सिंचनापासून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा नागभीड तालुक्यात सिंचन होण्याची सूतभरही शक्यता नाही. या कालव्याच्या रुपाने ठिकठिकाणी निर्माण झालेले मातीचे डोंगर पाहणे, अनवधानाने का होईना या कालव्यात मरण पावणे आणि सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करणे एवढेच या तालुक्यातील लोकांच्या नशिबी आले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरु नये. शेतकऱ्यांचा झाला हिरमोडसिंचनाचा या तालुक्यात कोणताच फायदा नसला तरी या कालव्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने अधिग्रहीत करण्यात आली. काही शेतकऱ्यांना तर अद्याप मोबदलाही मिळाला नसल्याचे समजते. खरे तर नागभीड तालुक्याला सिंचनाच्या कोणत्याही सोयी नाहीत. पुर्णत: नैसर्गिक पावसावर येथील शेती अवलंबून आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि काम सुरू झाले तेव्हा, या तालुक्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण नंतर या तालुक्यातील ४२ गावांचा या प्रकल्पात समावेशच नाही, ही सत्यता समोर आल्याने येथील शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला.