शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:05 IST

मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व : पीक विमा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी तहसीलवर धडक दिली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.ओबिसींचे आरक्षण २७ टक्के असताना वैद्यकीय प्रवेशात फक्त दोन टक्के आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करावी, ज्या शेतकऱ्यांनी सन २०१५-२०१६ मध्ये कर्ज घेतले. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना मार्च २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करावे, कृषी पंपासाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे पैसे भरले. मात्र दोन वर्षांपासून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यांना वीज पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाचे विजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, विज मंडळाने ग्राम विद्युत सेवकांचा प्रस्ताव ग्रामपंचायतकडून मागितला मात्र विद्युत सेवक अजूनही नेमण्यात आले नाही. परिणामी दुर्घटना घडत असल्याने विद्युत सेवकांची नियुक्ती करावी आदी मागण्यासाठी नगरपंचायत पटांगणातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला संबोधित करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, पीक विम्याच्या नावाखाली शेतकºयांंकडून पैसे वसूल करण्यात येतात. मात्र नुकसान भरपाई दिल्या जात नाही. हा केवळ कंपन्यांचा फायदा करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. हे खोटारडे सरकार असून यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तर माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी शेतकऱ्यांना १५ लाख देण्यापेक्षा हक्काची पीकविम्याची रक्कम द्यावी अशी मागणी केली.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महीला आघाडीच्या राज्य सचिव नंदा अल्लूरवार, माजी जि.प. सदस्य दिनेश चिटनूरवार, जि. प. सदस्य वैशाली शेरकी, नगराध्यक्ष विलास यासलवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा भोयर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेश सिध्दम, पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार, मनिषा जवादे, उर्मिला तरारे, संगिता चौधरी, राकेश गड्डमवार, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, युवक अध्यक्ष नितीन दुव्वावार, यांच्यासह शेकडो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.