शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

पहाडीवरील शेतकरी वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:05 IST

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकार्यालयातून अधिकारी गायब : कृषी कार्यालयातून शेतकºयांना माहितीच मिळेना

शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत. ऐन हंगामातच या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बुट्या मारत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांना खरिप हंगामातील पिकासंदर्भात योग्य माहिती मिळावी, जेणेकरून शेतकºयांना कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयाची निर्मीती करून गावोगावी कृषी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. मात्र हेच अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करित असल्याचा प्रकार मंगळवारी ११.३५ वाजता स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणला.या कार्यलयात कार्यरत १७ अधिकारी व कर्मचाºयांपैकी कार्यालयात केवळ १ मंडळ अधिकारी व तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात शासनाने पीक विमा योजनेबाबत जनजागृती करीत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. परंतु जिवती तालुक्यात कृषी विभागाच्या नियोजन शून्यकारभारामुळे पहाडावरील अनेक शेतकरी शासनाच्या पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जात असताना येथील कृषी कार्यालयामध्ये अजुनही बायोमॅट्रिक यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे आजही अधिकारी व कर्मचारी रजिस्टरवरच हस्ताक्षरद्वारे हजेरी लावत असल्याचे दिसून आले. शिवाय कार्यालयात व परिसरात स्वच्छतेची ऐसीतैसी झाल्याचे आढळून आले.कामाची गुणवत्ता ढासळलीसिंचनाची सोय व्हावी व जमिनीत पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात मातीबांध, ढाळाचे बांध, तुटफुट झालेल्या बंधाºयाची दुरूस्ती तसेच नाला खोलीकरण व बंधाºयातील गाळ काढणे इत्यादी कामे पारदर्शकपणे केल्याचे कृषी विभाग सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात कामाची पाहणी केल्यास भ्रष्टाचाराचे मोठे गौडबंगाल समोर येणार आहे.फुलोºयात आलेली पिकेही धोक्यातमागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांवर संकट कोसळले आहे. पिकाची वाढ समाधानकारक झाली असली तरी ऊन्हाच्या तिव्रतेने फुलोºयात आलेली पिके धोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मात्र पहाडावरील शेतकºयांत नाराजी पसरली आहे.सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असल्याने मार्ग बदलून कार्यालयात आलो. त्यामुळे यायला उशिर झाला.- इनायत शेख, तालुका कृषी अधिकारी, जिवती.