शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By admin | Updated: December 30, 2016 01:35 IST

सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या

पैशाची चणचण : व्यापाऱ्यांकडून मिळतात धनादेश, बँकेचे व्यवहार करणे अडचणीचे चंद्रपूर : सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या पैशाने देणं- घेणं करुन आपली उपजिविका करतो. मात्र, पीक विकूनही हातात पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र नागभीड तालुक्यात दिसून येत आहे. डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत शेतकऱ्यांचे धान्य निघत असल्याने बहुतेक शेतकरी धान्यविक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत असतात. धान्य विकून देण्याघेण्याचे व्यवहार करीत असतात. परंतु नोटाबंदीमुळे पैशाची चणचण भासत आहे. व्यापारीवर्गाकडून शेतकऱ्यांना चेकद्वारे व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांना त्रास होत आहे. धान्य विकूनही खर्चासाठी पैसा नाही म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे स्वत:चे बँकेत खाते नाही. मात्र, शेतकऱ्यांना चेक मिळत नसल्याने बँकेचे खाते काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरीवर्ग कमालीचा वैतागलेला आहे. ऐन देवाण-घेवाणीच्या हंगामात नोटांचा तुटवडा भासत असल्याने कामे ठप्प पडली आहेत. मुलामुलींचे विवाह जुळविण्याचे कार्यसुद्धा याच महन्यिात पार पडतात. मात्र, नोटाबंदीचा फटका लग्नकार्यालाही बसला आहे. लहान मोठे कार्य करु म्हटले तर जवळ पैसा नाही. बँका वेळेवर पैसे देत नाही. कमी पैशात काहीच कामे होत नाही. अशा अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा नोटाबंदीचा प्रभाव पडला आहे. लहान दुकानदारापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच नोटाबंदीचा फटका बसला आहे. पैसे नसल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सध्या सगळीकडे खरेदी-विक्री सुरु असल्याने नगदी रोकड मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी त्रस्त आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना धनादेशावर व्यवहार करणे अडचणी जात आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान नसल्याने दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.(वार्ताहर)