शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By admin | Updated: December 30, 2016 01:35 IST

सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या

पैशाची चणचण : व्यापाऱ्यांकडून मिळतात धनादेश, बँकेचे व्यवहार करणे अडचणीचे चंद्रपूर : सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या पैशाने देणं- घेणं करुन आपली उपजिविका करतो. मात्र, पीक विकूनही हातात पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र नागभीड तालुक्यात दिसून येत आहे. डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत शेतकऱ्यांचे धान्य निघत असल्याने बहुतेक शेतकरी धान्यविक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत असतात. धान्य विकून देण्याघेण्याचे व्यवहार करीत असतात. परंतु नोटाबंदीमुळे पैशाची चणचण भासत आहे. व्यापारीवर्गाकडून शेतकऱ्यांना चेकद्वारे व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांना त्रास होत आहे. धान्य विकूनही खर्चासाठी पैसा नाही म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे स्वत:चे बँकेत खाते नाही. मात्र, शेतकऱ्यांना चेक मिळत नसल्याने बँकेचे खाते काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरीवर्ग कमालीचा वैतागलेला आहे. ऐन देवाण-घेवाणीच्या हंगामात नोटांचा तुटवडा भासत असल्याने कामे ठप्प पडली आहेत. मुलामुलींचे विवाह जुळविण्याचे कार्यसुद्धा याच महन्यिात पार पडतात. मात्र, नोटाबंदीचा फटका लग्नकार्यालाही बसला आहे. लहान मोठे कार्य करु म्हटले तर जवळ पैसा नाही. बँका वेळेवर पैसे देत नाही. कमी पैशात काहीच कामे होत नाही. अशा अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा नोटाबंदीचा प्रभाव पडला आहे. लहान दुकानदारापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच नोटाबंदीचा फटका बसला आहे. पैसे नसल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सध्या सगळीकडे खरेदी-विक्री सुरु असल्याने नगदी रोकड मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी त्रस्त आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना धनादेशावर व्यवहार करणे अडचणी जात आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान नसल्याने दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.(वार्ताहर)