शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शेतीच्या प्रगतीसाठी महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:25 IST

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांच्या शिवाराची होणार निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, रासायनिक खते, बियाणे आणि शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या हेतुने यापूर्वीदेखिल कृषी विभागाने योजना तयार केल्या होत्या. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे योजना कागदावरच राहिल्या. याचा अनिष्ठ परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेतात. त्यामुळे फारसे उत्पादन हाती येत नाही. ऐन हंगामाच्या कालावधीत योग्य मार्गदर्शनाअभावी चुकीचे बियाणे वापरले जाते, याचा फटका शेतकºयांना बसतो.गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाबाबत हा प्रकार घडला. भद्रावती, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला. या हंगामात जिल्ह्यातील काही निवडक शेतकºयांच्या शेती शिवारात शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेला अधिकाधिक महिला शेतकरी उपस्थित राहतील, यादृष्टीने कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.प्रत्येक शेती शाळेसाठी १४ हजारांची तरतूदजिल्ह्यातील शेती शाळेसाठी शासनाने १४ हजार रूपयांची तरतूद केली आहे. कृषी सहाय्यकांकडून क्रापसॅफद्वारे निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात शिवारात ही शेतीशाळा होईल. कार्यशाळा पार पडल्यानंतर संबंधित अहवाल नोंदणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेची जबाबदारी आत्मावर सोपविण्यात आली आहे.