शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

आर्थिक मदतीअभावी शेतकरी गट हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:31 IST

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : कृषिपूरक प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.पारंपरिक शेतीपासून काहीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषीगट स्थापन केले. या गटाद्वारे आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. गटांची स्थापना करण्यासाठी कृषी विभागाने सहकार्य केले होते.या गटाद्वारे विकास योजनांचा लाभ मिळेल, असे वाटत होते. पण निधी मिळत नसल्याने कृषीपूरक कामांना गती आली नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल अल्पदरात व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यास मोठे आर्थिक नुकसान होते. या भितीपोटी शेकडो शेतकरी एकत्र आले. शेतमाल बाजारात थेट न विकता यापासून मूल्यवर्धन कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांने प्रशिक्षणाद्वारे विविध योजनांची माहिती दिली. अभ्यास दौरेही झाले. परंतु, उत्पन्न वाढविणारे कृषीवर आधारीत लघुउद्योग उभारताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतमालाचा मूल्यवर्धनाची प्रक्रिया जिल्ह्यात पुढे जाऊ शकली नाही. काही शेतकऱ्यांनी सामूहिक श्ोतीसाठी यंत्रसामग्री विकत घेतली. काही गटांकडे टॅÑक्टर आहेत. पण, आर्थिक विकासासाठी याचा पुरेसा वापर करता येत नाही. इच्छा असूनही पैशाअभावी रखडलेली कामे पूर्ण करणे कठीण झाले. त्यामुळे शेतकरी गटांमध्ये निराशा पसरली आहे.प्रकल्पाची तांत्रिक, पायाभूत कामे ठप्पसहा तालुक्यातील शेतकरी गटांनी प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रणा उभारली. याकरिता शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. पायाभूत कामे झाली. मात्र वीज आणि अन्य तांत्रिक उपकरणे मिळाली नाही. त्यामुळे प्रकल्प कसा पुढे न्यावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.मूल्यवर्धनाकडे शेतकऱ्यांचा कलपारंपरिक शेतीमुळे आर्थिक लाभ होत नाही, हे शेतकऱ्यांना कळू लागले आहे. यामुळे नवीन तंत्रज्ञान व मूल्यवर्धन लहान प्रकल्पाकडे शेतकरी आकर्षित झाला. त्यामुळे अशा प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे.