शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना मिळणारच

By admin | Updated: September 11, 2015 01:22 IST

पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळग्रस्त सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात १५ सप्टेंबर पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणारच,

विजय वडेट्टीवार : गराडी नाल्यावर पाईप टाकण्याचे काम पूर्ण सावली : पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळग्रस्त सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात १५ सप्टेंबर पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणारच, असे अभिवचन सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिले.गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडावे, यासाठी आपण तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि संबंधित विभागाच्या वतीने गराडी नाल्यावर दिवसरात्र पाईप टाकण्याचे काम करवून घेतले. १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन त्यांनी दिले.पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातच नव्हे, तर आसोलामेंढा तलावातही पाण्याचा ठणठणात आहे. हा तलाव पूर्ण भरला तर सावली आणि मूल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता येईल. मात्र या वर्षीच्या अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार वडेट्टीवारांनी जलसंधारण विभगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन एक महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मात्र आसोलामेंढा तलावात पाणी येणार नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरला शेतकऱ्यांना सिंचनासाठी पााणी मिळेलच, असे अभिवचन दिले. गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाल्यास अंतिम घटका मोजत असलेल्या पिकांना जीवदान मिळेल, पाण्यासाठी होत असलेली शेतकऱ्यांची धावपळ थांबेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शीतल संगीडवार, संदीप पुण्यपकर, प्रफुल्ल बोम्मनवार, शेतकरी सहकारी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, प्रशांत रार्इंचवार, मौसम सुरमवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)