शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे.

ठळक मुद्देतक्रारीनंतरही तहसीलदारांचे दुर्लक्ष : शेतकºयांसाठी कर्जमाफी की डोकेदुखी?

राकेश बोरकुंडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. आधीच शेतीकामात व्यस्त असलेला शेतकरी अशा उफराट्या कामामुळे बेजार झाला आहे.कर्जमाफीकरिता शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरून द्यावयाचा आहे. हा अर्ज एक तर इंटरनेट कॅफे किंवा शासन नियुक्त ग्रामदूत, सुविधा केंद्रातून भरावयाचा आहे. त्याकरिता शेतकरी दाम्पत्यालाच सुविधा केंद्रावर यावे लागते. दोघांचेही आधार कार्ड व बँक बचत खात्याच्या पासबुकांची छायांकित प्रत सोबत आणावी लागते. शहरात आॅनलाईन सेवा नेहमीच विस्कळीत असते. गेल्या काही आठवड्यापासून दर आठवड्यात दोन ते तीन दिवस ही सेवा ठप्प असते. ग्रामीण भागातून कर्जमाफीचा अर्ज भरण्याकरिता येणाºया शेतकºयांना लिंक नाही, असे सांगण्यात आल्यावर त्या शेतकºयांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. लिंक सुरू होईल, या आशेवर तो संपूर्ण दिवस रांगेत असतो. अखेर अर्ज न भरताच गावाला जावे लागते. त्यामुळे येण्या जाण्याचा नाहक भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागत आहे. दिवसभरात ग्रामदूत व सुविधा केंद्रावरून काम न झाल्याने निराश होवून परत जाणाºया शेतकºयांची संख्या वाढली असल्याची दिसते. काही शेतकºयांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या. पण तहसीलदार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणाच प्रभावी नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सेतू केंद्र बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सर्वात जास्त फटका बसत आहे. छोट्या-छोट्या कामासाठी आॅनलाईन केंद्रात जावून त्या कागदाची पुर्तता करावी लागत असल्याने नागरिकांचा सरकार व प्रशासनावर रोष वाढत असल्याचे तालुक्यात दिसत आहे. याबाबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसुद्धा उदासीन दिसत आहे.