शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST

मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून

नागरी (रेल्वे) : मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरोरा तालुक्यात नागरी उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सकाळी ७ वाजता धडक मोर्चा काढून येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदी बनविण्याचा प्रयत्न केला.माढेळी पॉवर स्टेशनअंतर्गत नागरीसाठी असलेल्या मेन लाईनवर माढेळी भागाचे १५ ट्रान्सफार्मर जोडल्या गेले. येथे कनिष्ठ अभियंता नाही, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. यामुळे महावितरणने नागरी परिसर वाऱ्यावर सोडला आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकरी रस्त्यावर उतरले. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विपरीत परिणामाला सामोरे जा, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. जमावाला पांगविण्यासाठी घटनास्थळावर पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे पोहोचले. जमावाला शांत करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता सराफ, उपकार्यकारी अभियंता नागदेवते यांना घटनास्थळावर बोलविले. पण ते न आल्याने दूरध्वनीवर त्यांच्यासोबत चर्चा करुन दोन दिवसांत असलेली अडचण दूर केल्या जाईल, असे आश्वासन दिले आणि जमाव शांत करण्यास त्यांनी महत्वाची भूमिका निभवली. वास्तविक या महिन्याभरात शेतकऱ्यांना ओलीत करतान न आल्याने शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे करपले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या मोर्चामध्ये दिलीप टिपले, चंद्रशेखर नोकरकर, इस्तेखा पठाण, विनोद वाटमोडे, प्रमोद धात्रक, शरद भलमे, बुरीले, उदयसिंग दीक्षित यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)