शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

गडचांदूर : शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दीड ते दोन वर्षांपासून शेतातील वीज जोडणीचे डिमांड भरूनही अजूनपर्यंत शेतात वीज न पोहचल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.गडचांदूर व कोरपना या दोन्ही ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची कामे करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे घेऊन काम करून देण्याचा प्रकार येथे होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राजकीय पाठबळ असलेले व सदन शेतकरी पैसे देऊन आपली कामे तत्काळ करून घेतात. त्यांना कसलेही नियम सांगण्यात येत नाही. मात्र आपला क्रमांक लागेल, या आशेने शेतातील वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी मात्र मराविमंच्या अधिकाऱ्यांकडे नियमांचे मोठमोठे ग्रंथ आहे. तुमचा क्रमांक आल्याशिवाय काम चालू होणार नाही. अशीच भाषा ऐकायला मिळत असल्याने. शेतकरी सध्या त्रस्त झाले आहे.तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, मानोली, थुट्रा, गाडेगाव, सोनुर्ली (गाडे), विरूर, तळोदी, भोयगाव, कवठाळा, कढोली (खु), सांगोडा, वनोजा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, कोरपना, लोणी, वनसडी, धानोली, कोडशी, परसोडा, पारडी अशा अनेक गावातील शेतकरी कंपनीच्या या धोरणामुळे हैराण झाले आहेत.या धोरणामुळे वीज कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात आहे. प्रतीक्षा यादीत क्रमांक आल्यानंतरही त्यांना कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ट्रान्सफार्मर सुरू केल्यानंतरही एक-दोन दिवसातच पुन्हा बंद पडतात. ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आपली अडचण सांगायची कुणाला, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वीज जोडणीविषयी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)