शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

गडचांदूर : शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दीड ते दोन वर्षांपासून शेतातील वीज जोडणीचे डिमांड भरूनही अजूनपर्यंत शेतात वीज न पोहचल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.गडचांदूर व कोरपना या दोन्ही ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची कामे करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे घेऊन काम करून देण्याचा प्रकार येथे होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राजकीय पाठबळ असलेले व सदन शेतकरी पैसे देऊन आपली कामे तत्काळ करून घेतात. त्यांना कसलेही नियम सांगण्यात येत नाही. मात्र आपला क्रमांक लागेल, या आशेने शेतातील वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी मात्र मराविमंच्या अधिकाऱ्यांकडे नियमांचे मोठमोठे ग्रंथ आहे. तुमचा क्रमांक आल्याशिवाय काम चालू होणार नाही. अशीच भाषा ऐकायला मिळत असल्याने. शेतकरी सध्या त्रस्त झाले आहे.तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, मानोली, थुट्रा, गाडेगाव, सोनुर्ली (गाडे), विरूर, तळोदी, भोयगाव, कवठाळा, कढोली (खु), सांगोडा, वनोजा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, कोरपना, लोणी, वनसडी, धानोली, कोडशी, परसोडा, पारडी अशा अनेक गावातील शेतकरी कंपनीच्या या धोरणामुळे हैराण झाले आहेत.या धोरणामुळे वीज कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात आहे. प्रतीक्षा यादीत क्रमांक आल्यानंतरही त्यांना कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ट्रान्सफार्मर सुरू केल्यानंतरही एक-दोन दिवसातच पुन्हा बंद पडतात. ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आपली अडचण सांगायची कुणाला, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वीज जोडणीविषयी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)