शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

गडचांदूर : शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दीड ते दोन वर्षांपासून शेतातील वीज जोडणीचे डिमांड भरूनही अजूनपर्यंत शेतात वीज न पोहचल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.गडचांदूर व कोरपना या दोन्ही ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची कामे करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे घेऊन काम करून देण्याचा प्रकार येथे होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राजकीय पाठबळ असलेले व सदन शेतकरी पैसे देऊन आपली कामे तत्काळ करून घेतात. त्यांना कसलेही नियम सांगण्यात येत नाही. मात्र आपला क्रमांक लागेल, या आशेने शेतातील वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी मात्र मराविमंच्या अधिकाऱ्यांकडे नियमांचे मोठमोठे ग्रंथ आहे. तुमचा क्रमांक आल्याशिवाय काम चालू होणार नाही. अशीच भाषा ऐकायला मिळत असल्याने. शेतकरी सध्या त्रस्त झाले आहे.तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, मानोली, थुट्रा, गाडेगाव, सोनुर्ली (गाडे), विरूर, तळोदी, भोयगाव, कवठाळा, कढोली (खु), सांगोडा, वनोजा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, कोरपना, लोणी, वनसडी, धानोली, कोडशी, परसोडा, पारडी अशा अनेक गावातील शेतकरी कंपनीच्या या धोरणामुळे हैराण झाले आहेत.या धोरणामुळे वीज कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात आहे. प्रतीक्षा यादीत क्रमांक आल्यानंतरही त्यांना कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ट्रान्सफार्मर सुरू केल्यानंतरही एक-दोन दिवसातच पुन्हा बंद पडतात. ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आपली अडचण सांगायची कुणाला, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वीज जोडणीविषयी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)