शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

गडचांदूर : शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दीड ते दोन वर्षांपासून शेतातील वीज जोडणीचे डिमांड भरूनही अजूनपर्यंत शेतात वीज न पोहचल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.गडचांदूर व कोरपना या दोन्ही ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची कामे करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे घेऊन काम करून देण्याचा प्रकार येथे होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राजकीय पाठबळ असलेले व सदन शेतकरी पैसे देऊन आपली कामे तत्काळ करून घेतात. त्यांना कसलेही नियम सांगण्यात येत नाही. मात्र आपला क्रमांक लागेल, या आशेने शेतातील वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी मात्र मराविमंच्या अधिकाऱ्यांकडे नियमांचे मोठमोठे ग्रंथ आहे. तुमचा क्रमांक आल्याशिवाय काम चालू होणार नाही. अशीच भाषा ऐकायला मिळत असल्याने. शेतकरी सध्या त्रस्त झाले आहे.तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, मानोली, थुट्रा, गाडेगाव, सोनुर्ली (गाडे), विरूर, तळोदी, भोयगाव, कवठाळा, कढोली (खु), सांगोडा, वनोजा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, कोरपना, लोणी, वनसडी, धानोली, कोडशी, परसोडा, पारडी अशा अनेक गावातील शेतकरी कंपनीच्या या धोरणामुळे हैराण झाले आहेत.या धोरणामुळे वीज कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात आहे. प्रतीक्षा यादीत क्रमांक आल्यानंतरही त्यांना कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर नादुरूस्त असल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. ट्रान्सफार्मर सुरू केल्यानंतरही एक-दोन दिवसातच पुन्हा बंद पडतात. ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळेही अनेक शेतकऱ्यांना विजेअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आपली अडचण सांगायची कुणाला, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वीज जोडणीविषयी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)