शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: July 8, 2016 00:51 IST

खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे.

गुंजेवाही : खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. अशातच पिककर्ज मिळविण्यासाठी बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट होत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटत आहे.यावर्षी हवामान विभागाने पर्जन्यवृष्टी संदर्भात चांगला अंदाज वर्तविला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आशेचा किरण दिसत आहे. यावर्षी तरी निसर्गराजा कृपा करेल, अशी प्रार्थना करीत शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. मे महिन्याच्या अंतीम टप्प्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी वखरणी करुन व काडीकचरा वेचून पेरणीसाठी शेती सज्ज केली. प्रखर उन्हातच शेतकरी मशागतच्या कामाला जोमाने लागला होता. सद्यस्थितीत अनेकांच्या पेरण्या झाल्या. आता शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे काहीजण नवीन पीककर्ज तर काहीजन पूनर्गठन करुन पिककर्ज घेण्यासाठी कागदपत्राच्या जुळवाजुळवीत लागला आहे. या कागदपत्राची ज़ुळवाजुळव करताना तलाठी कार्यालयाकडून प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. पण काही ठिकाणी तलाठीच जागेवर मिळत नाही. तर काही ठिकाणी तलाठ्याकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. बँक व्यवस्थापनही प्रतिसाद द्यायला तयार नसल्याने पायपीट होत आहे. (वार्ताहर)