शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महासंघाचा शेतकरी मेळावा

By admin | Updated: January 16, 2017 00:44 IST

स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला.

वनौषधीची शेती करावी : अनेक शेतकऱ्यांची उपस्थितीबाखर्डी : स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरूण धोटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेशी महासंघाचे अ‍ॅड कांचन कोतवाल तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संचालक रत्नाकर हजारे, जिल्हा रा.सं महासंघाचे प्रमोद अलोने, रा.सं महासंघाचे अभय ढेंगे, प्रा.उमेश राजुरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अ‍ॅड कांचन कोतवाल म्हणाले, शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नेहमीच तोट्यात येतो. याचे मुख्य कारण देशात धानाचे उत्पादन गरजेपेक्षा तिन पट होते. आणि भाव मागणी पुरवठयाच्या सिद्धांतानुसार ठरवीले जातात. सेंद्रीय खताच्यासह्याने पिकवलेल्या धान्याला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण विदर्भातील शेतकरी मात्र रासायनिक खताच्या सह्याने शेती करतात. सेद्रीय विषमुक्त शेती केल्यास योग्य भाव मिळू शकतो. व त्याद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकतो. याच उद्देशाने शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, याकरिता स्वदेशी महासंघाची स्थापना झाली. स्वदेशी महासंघ शेती ही भाडे तत्त्वावर घेतो व वनऔषधीची लागवड करतो, त्याकरिता शेतकऱ्यांना वरपाणी कोरडवाहू शेती १५ हजार रूपये, कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार रूपये, तर बारमाही ओलीतासाठी ५० हजार रूपये प्रती एकरी एक वर्षासाठी देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना शेतीत काम करण्याची संधी पण दिली जाते. त्यासाठी त्यांना मासिक वेतन व मानधन देण्यात येते. याकरिता महासंघाने मोठी फळी उभी केली आहे. त्यामुळे गावं खेड्यातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असे वक्तव्य केले.यावेळी राष्ट्रीय संचालक प्रमोद अलोने म्हणाले, सध्या संपूर्ण देशातच नाही तर जगात आयुर्वेदिक औषधीची मागणी मोठया प्रमाणात आहे. परंतु त्यांचा पुरवठा अत्यल्प आहे. जर शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बदलून औषधी शेती केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते.अध्यक्षीय भाषणामध्ये अरूण धोटे म्हणाले, वनोऔषधी शेती ही स्वदेशी महासंघाद्वारे आलेली एक सुवर्ण संधी आहे. यामुळे मोठी क्रांती घडू शकते. परंतु शेतकऱ्यांनी शेती ठेक्याने देऊन आळशी बनू नये, तर स्वत: महासंघाशी जुळून शेतीत राबावे व आपली उन्नती करावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर हजारे यांनी केले. तर आभार सुरेश लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव डाहूले, राजु चिलमंतलवार, शेषराव धाबेकर, वासुदेव येरगुडे, राजकुमार रामटेके, रविंद्र थेरे, आशिष मोहुलेॅ श्रीकांत लोडे यांनी सहकार्य केले यावेळी राजुरा, बल्लारशा, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)