शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांचा आवडता रोवणी महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव ...

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव म्हणजे धानाची रोवणी. यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी या उत्सवाला सुरूवात केली आहे. या उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले असून हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. आणि या पिकावरच शेतकऱ्यांची वार्षिक गणिते अवलंबून असतात. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुलामुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे.

तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६६०.४५ हेक्टर आहे. यातील वाहितीखालील क्षेत्र ३१ हजार २०५.४९ हेक्टर असून यापैकी जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पऱ्हे टाकावे लागतात. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर पऱ्हे टाकण्यास सुरूवात होते. जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. मात्र यावर्षी योग्य पाऊस पडल्याने पऱ्हे यापूर्वीच टाकून झाले व वाढही योग्यप्रकारे झाली. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षी पऱ्ह्यांचा हंगाम योग्य व वेळीच झाला आणि पाऊसही आवश्यकतेनुसार पडत असल्याने रोवणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.

बॉक्स

अशी आहे मजुरी

अगदी सकाळी ७ वाजेपासून हे शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून संध्याकाळी ६ वाजता मोकळे होतात. एरव्ही १०० ते १२५ रूपये असणारी एका स्त्रीची एका दिवसाची मजुरी २०० रूपयापर्यंत गेली आहे. पुरुषाला ३०० रूपये मिळत आहेत. महिला वर्गाकडून गट स्थापन करून दरएकरी पऱ्हे व रोवणी करण्याचे तीन हजार रूपये घेण्यात येत आहेत.

बॉक्स

शेतीतून चार महिने काम

शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी हे खरे नाही. मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.