शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शेतकऱ्यांचा आवडता रोवणी महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव ...

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव म्हणजे धानाची रोवणी. यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी या उत्सवाला सुरूवात केली आहे. या उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले असून हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. आणि या पिकावरच शेतकऱ्यांची वार्षिक गणिते अवलंबून असतात. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुलामुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे.

तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६६०.४५ हेक्टर आहे. यातील वाहितीखालील क्षेत्र ३१ हजार २०५.४९ हेक्टर असून यापैकी जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पऱ्हे टाकावे लागतात. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर पऱ्हे टाकण्यास सुरूवात होते. जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. मात्र यावर्षी योग्य पाऊस पडल्याने पऱ्हे यापूर्वीच टाकून झाले व वाढही योग्यप्रकारे झाली. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षी पऱ्ह्यांचा हंगाम योग्य व वेळीच झाला आणि पाऊसही आवश्यकतेनुसार पडत असल्याने रोवणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.

बॉक्स

अशी आहे मजुरी

अगदी सकाळी ७ वाजेपासून हे शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून संध्याकाळी ६ वाजता मोकळे होतात. एरव्ही १०० ते १२५ रूपये असणारी एका स्त्रीची एका दिवसाची मजुरी २०० रूपयापर्यंत गेली आहे. पुरुषाला ३०० रूपये मिळत आहेत. महिला वर्गाकडून गट स्थापन करून दरएकरी पऱ्हे व रोवणी करण्याचे तीन हजार रूपये घेण्यात येत आहेत.

बॉक्स

शेतीतून चार महिने काम

शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी हे खरे नाही. मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.