शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

शेतकऱ्यांचा आवडता रोवणी महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव ...

दहा तास शेतकरी शेतातच : गावे ओसाड, शिवार गर्दीने फुलले

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वार्षिक उत्सव म्हणजे धानाची रोवणी. यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी या उत्सवाला सुरूवात केली आहे. या उत्सवाने शेतकऱ्यांच्या आनंदाला चांगलेच भरते आले असून हा आनंद शिवारातूनही ओसंडून वाहत आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. आणि या पिकावरच शेतकऱ्यांची वार्षिक गणिते अवलंबून असतात. कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा, मुलामुलींचे लग्नकार्य, औषधपाणी, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन आदी अनेक बाबींचा यात समावेश आहे.

तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६६०.४५ हेक्टर आहे. यातील वाहितीखालील क्षेत्र ३१ हजार २०५.४९ हेक्टर असून यापैकी जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. या धानाच्या हंगामासाठी अगोदर पऱ्हे टाकावे लागतात. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर पऱ्हे टाकण्यास सुरूवात होते. जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. मात्र यावर्षी योग्य पाऊस पडल्याने पऱ्हे यापूर्वीच टाकून झाले व वाढही योग्यप्रकारे झाली. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षी पऱ्ह्यांचा हंगाम योग्य व वेळीच झाला आणि पाऊसही आवश्यकतेनुसार पडत असल्याने रोवणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.

बॉक्स

अशी आहे मजुरी

अगदी सकाळी ७ वाजेपासून हे शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामास लागत असून संध्याकाळी ६ वाजता मोकळे होतात. एरव्ही १०० ते १२५ रूपये असणारी एका स्त्रीची एका दिवसाची मजुरी २०० रूपयापर्यंत गेली आहे. पुरुषाला ३०० रूपये मिळत आहेत. महिला वर्गाकडून गट स्थापन करून दरएकरी पऱ्हे व रोवणी करण्याचे तीन हजार रूपये घेण्यात येत आहेत.

बॉक्स

शेतीतून चार महिने काम

शासन मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या कितीही वल्गना करीत असले तरी हे खरे नाही. मजूर वर्गाला सतत तीन महिने काम देण्याची शक्ती फक्त शेती आणि शेतीतच आहे. रोवणीचा हा हंगाम साधारणतः २५ ते ३० दिवस, त्यानंतर निंदन, धान कापणी यात मजुरांना नियमित रोजगार मिळत असतो. याशिवाय ट्रॅक्टर, कृषी केंद्र यांचेही अर्थचक्र गती पकडत असते.