शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !

By admin | Updated: December 13, 2014 22:34 IST

राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने

समाधान मेळावा : नक्षलग्रस्त गावात पोहोचले राज्यपालराजुरा : राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने नुकत्याच काही मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढविली आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी आशा सोडू नये, शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नवी उर्मी दिली.राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना व जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, आता जनतेला जलद सेवा देण्याचे दिवस आले आहेत. सेवा प्राप्त करून घेणे हा जनतेचा हक्क असून सुवर्ण जयंती राजस्व अभियानासारखे कार्यक्रम सर्व विभागाच्या सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. अशा सेवा जनतेला तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येतात, तेव्हाच जनतेमध्ये समाधान तसेच शासनाप्रति विश्वास निर्माण होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तेलगू-मराठी भाषकांचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबध्द असून जनतेच्या कल्याणासाठीच तिजोरीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात राजस्व विभागाकडून विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतराचे पट्टे, वनाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिलांना धनादेश राज्यपालाच्या हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)