शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !

By admin | Updated: December 13, 2014 22:34 IST

राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने

समाधान मेळावा : नक्षलग्रस्त गावात पोहोचले राज्यपालराजुरा : राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने नुकत्याच काही मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढविली आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी आशा सोडू नये, शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नवी उर्मी दिली.राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना व जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, आता जनतेला जलद सेवा देण्याचे दिवस आले आहेत. सेवा प्राप्त करून घेणे हा जनतेचा हक्क असून सुवर्ण जयंती राजस्व अभियानासारखे कार्यक्रम सर्व विभागाच्या सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. अशा सेवा जनतेला तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येतात, तेव्हाच जनतेमध्ये समाधान तसेच शासनाप्रति विश्वास निर्माण होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तेलगू-मराठी भाषकांचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबध्द असून जनतेच्या कल्याणासाठीच तिजोरीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात राजस्व विभागाकडून विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतराचे पट्टे, वनाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिलांना धनादेश राज्यपालाच्या हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)