शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !

By admin | Updated: December 13, 2014 22:34 IST

राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने

समाधान मेळावा : नक्षलग्रस्त गावात पोहोचले राज्यपालराजुरा : राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने नुकत्याच काही मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढविली आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी आशा सोडू नये, शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नवी उर्मी दिली.राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना व जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले, आता जनतेला जलद सेवा देण्याचे दिवस आले आहेत. सेवा प्राप्त करून घेणे हा जनतेचा हक्क असून सुवर्ण जयंती राजस्व अभियानासारखे कार्यक्रम सर्व विभागाच्या सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. अशा सेवा जनतेला तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येतात, तेव्हाच जनतेमध्ये समाधान तसेच शासनाप्रति विश्वास निर्माण होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तेलगू-मराठी भाषकांचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबध्द असून जनतेच्या कल्याणासाठीच तिजोरीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात राजस्व विभागाकडून विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतराचे पट्टे, वनाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिलांना धनादेश राज्यपालाच्या हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)