शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

कृषी विभागाच्या लेखणी बंदचा नागरिकांना फटका

By admin | Updated: October 13, 2016 02:24 IST

सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे

संघटना तटस्थ: अनेक योजनांचे साहित्य वाटप बंदगोंडपिपरी : सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वर्गाला याचा चांगलाच फटका बसत असून येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयाची दैनंदिन पायपीट करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ग्राम विकास मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने अनेकदा वरिष्ठांसोबत चर्चा केली. मात्र समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धरणे आंदोलनेही झालीत. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे दर्शविल्याने काही काळाकरिता कृषी संघटनेने आंदोलन मागेही घेतले. परंतु समस्या निकाली व काढल्याने अखेर ३ आॅक्टोबर २०१६ पासून कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढवून लेखणी बंद आंदोलन सुरु केले.बेमुदत सुरु असलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील दुर्बल घटक शासनाच्या जनकल्याणकारी योजनापासून वंचित राहत असून या आंदोलनामुळे साहित्य वाटप, नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आचार संहिता लागू होत असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचणे कठीण जाणार आहे. शासनाने संघटनासोबतचा तिढा सोडवून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)