शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृषी विभागाच्या लेखणी बंदचा नागरिकांना फटका

By admin | Updated: October 13, 2016 02:24 IST

सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे

संघटना तटस्थ: अनेक योजनांचे साहित्य वाटप बंदगोंडपिपरी : सध्या राज्यभरात सुरु असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध मागण्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वर्गाला याचा चांगलाच फटका बसत असून येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयाची दैनंदिन पायपीट करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ग्राम विकास मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने अनेकदा वरिष्ठांसोबत चर्चा केली. मात्र समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धरणे आंदोलनेही झालीत. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे दर्शविल्याने काही काळाकरिता कृषी संघटनेने आंदोलन मागेही घेतले. परंतु समस्या निकाली व काढल्याने अखेर ३ आॅक्टोबर २०१६ पासून कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढवून लेखणी बंद आंदोलन सुरु केले.बेमुदत सुरु असलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील दुर्बल घटक शासनाच्या जनकल्याणकारी योजनापासून वंचित राहत असून या आंदोलनामुळे साहित्य वाटप, नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आचार संहिता लागू होत असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचणे कठीण जाणार आहे. शासनाने संघटनासोबतचा तिढा सोडवून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)