शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कोठारी भागात कापसाचे पीक घटल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST

कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने ...

कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने कापसाची उतारी घटली. त्यामुळे शेतकरी संकटात

सापडले आहेत.

यावर्षी चालू हंगामात कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापूस पिकाची लागवड केली. मुळात कापूस पीक नगदी स्वरुपात असले तरी फारच खर्चिक पीक आहे. त्यातही यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आणि सततच्या ढसाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने शेतकऱ्यांना फवारणी खर्च, रासायनिक खतांचा खर्च, मजुरांचा खर्च अधिक झालेला आहे आणि त्यात अती पावसामुळे डवरणी व खुरपणीचे काम वेळोवेळी होऊ शकले नाही. एवढेच नाही तर कपाशीला बोंडे लहान आणि वेचणीसाठी मजुरांना उरक होत नसल्याने वेचणीचे अमाप दर वाढले. त्यामुळे खर्चात अवाढव्य भर पडली. त्यातच सिटीच्या नावाने विकण्यात आलेल्या या बियांण्यामथ्ये बिटी जीवाणूचे गुणधर्म आढळून आले. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला.

सदर बियांपासून लागवड झालेल्या कपाशीच्या झाडांना लागलेल्या बोंडामध्ये बिटी जीवाणू गुणधर्म नाही. त्यामुळे बोंड अळीचा प्रतिकार करण्याची क्षमता पिकात नाही. परिणामी ८० टक्के बोंडे खराब झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीला बिटी बियाणे विकणाऱ्या कंपन्या जबाबदार असून, त्यांनी शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केल्याचे दिसून येते.

शासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन बिटी नावाने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी. नुकसानाची योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी सुनील फरकडे, संतोष ईटनकर, अनिल मुंढे, अजय तोटावार, राजकुमार परेकर, संजय गुरु, राजू जुनघरे, प्रीतम गिरटकर, सुभाष साळवे, धनराज हिवरे यांनी केली आहे.