शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोठारी भागात कापसाचे पीक घटल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST

कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने ...

कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने कापसाची उतारी घटली. त्यामुळे शेतकरी संकटात

सापडले आहेत.

यावर्षी चालू हंगामात कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापूस पिकाची लागवड केली. मुळात कापूस पीक नगदी स्वरुपात असले तरी फारच खर्चिक पीक आहे. त्यातही यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आणि सततच्या ढसाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने शेतकऱ्यांना फवारणी खर्च, रासायनिक खतांचा खर्च, मजुरांचा खर्च अधिक झालेला आहे आणि त्यात अती पावसामुळे डवरणी व खुरपणीचे काम वेळोवेळी होऊ शकले नाही. एवढेच नाही तर कपाशीला बोंडे लहान आणि वेचणीसाठी मजुरांना उरक होत नसल्याने वेचणीचे अमाप दर वाढले. त्यामुळे खर्चात अवाढव्य भर पडली. त्यातच सिटीच्या नावाने विकण्यात आलेल्या या बियांण्यामथ्ये बिटी जीवाणूचे गुणधर्म आढळून आले. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला.

सदर बियांपासून लागवड झालेल्या कपाशीच्या झाडांना लागलेल्या बोंडामध्ये बिटी जीवाणू गुणधर्म नाही. त्यामुळे बोंड अळीचा प्रतिकार करण्याची क्षमता पिकात नाही. परिणामी ८० टक्के बोंडे खराब झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीला बिटी बियाणे विकणाऱ्या कंपन्या जबाबदार असून, त्यांनी शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केल्याचे दिसून येते.

शासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन बिटी नावाने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी. नुकसानाची योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी सुनील फरकडे, संतोष ईटनकर, अनिल मुंढे, अजय तोटावार, राजकुमार परेकर, संजय गुरु, राजू जुनघरे, प्रीतम गिरटकर, सुभाष साळवे, धनराज हिवरे यांनी केली आहे.