शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:49 IST

तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न देणे, बाजार समितीमध्ये अडत वसूल करणे, आदी कारणांमुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अडत वसुलीने तालुक्यातील शेतकरी त्रस्त

मनोज गोरे।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न देणे, बाजार समितीमध्ये अडत वसूल करणे, आदी कारणांमुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. पिकविलेला शेतमाल अधिकृत खरेदी केंद्रात विक्री करताना अडचणी येत आहे. २००३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आली. गडचांदूर येथे बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व सोयीसुविधा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र शेतमाल खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारांची मनमानी सुरू झाली आहे.कोरपना परिसरात तीन ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असली तरी, २४ तासांच्या आत धनादेश मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. याशिवाय प्रत्येक जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून दोन ते तीन रुपये अडत वसुल केली जात आहे. शासनाने अडत वसुली बंद करुनही हा प्रकाश अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अल्प पाऊस व बोंड अळीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. शेतकरी आर्थिक विवेचंनेत आहेत. त्यामुळे बाजारात मंदी आली. गुरांना चारा मिळणे कठिण झाले. समाधानकारक पाऊस न पडल्याने यंदा शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे संपली पण आता हाताला काम नाही. शेतमाल विकूनही पुरेसे पैसे हाती आले नाही.युवकांमध्ये नाराजीतालुक्यातील जनता प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी कुटुंबातील नवी पिढी शिक्षण घेत आहे. परंतु शेतीच्या आधारावर प्रपंच आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. शासनाने नोकरभरती बंद केली. तर दुसरीकडे तालुक्यातील उद्योगांवर अवकळा आली आहे. शेतीशिवाय अन्य कोणताही रोजगार तालुक्यात उपलब्ध नाही. शिक्षण घेतलेले युवक हतबल झाले आहेत. रोजगार मिळणे कठीण झाल्याने सरकारविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.आधारभूत किंमतीकडे कानाडोळाशेतमाल विक्रीसाठी शासनाने आधारभूत किंमत जाहीर केली. शेतकऱ्यांची आर्थिक लुट होऊ नये व शेतमाला रास्तभाव मिळावा, हा या योजनेचा हेतू आहे. मात्र, आधारभूत कि मतीची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप तालुक्यातील शेतकरी करीत आहे.