शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाच्या बंदीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: January 17, 2015 02:09 IST

ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

नवरगाव : ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला. २०१४ मध्ये पटाला मान्यता मिळाली असली तरी २०१५ मध्ये पुन्हा शंकरपट अडचणीत सापडले आहेत.नवरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बैलांचे शंकरपट भरविले जात होते. त्याची ख्याती पंचक्रोशीत होती. शेतीची कामे झाली की शेतकरी विरंगुळा म्हणून जानेवारीपासून ग्रामीण भागामध्ये शंकरपटाला सुरूवात करायचे. जानेवारीपासून ते मे-जूनपर्यंत गावागावांत शंकरपट भरायचे. शेतकरी त्या दृष्टीने बैलजोड्या तयार करून त्यांच्या खाण्याची विशेष व्यवस्था करायचे. एक-दोन महिन्यात बैल धष्टपुष्ट झाल्यानंतर शंकरपटात बैलाच्या शर्यती लावायचे. जिंकणाऱ्या बैलजोडीला विशेष बक्षिसे दिली जात. ज्या शेतकऱ्यांची जोडी जिंकली त्याच्याकडे पाहण्याचा इतर शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलून जायचा याच प्रतिष्ठेपोटी शेतकरी आपल्या घरी पाच-दहा बैलजोड्या ठेवायचे व परिसरात होणाऱ्या शंकरपटात बैलजोड्या हाकायचे.या परिसरात देलनवाडी, रत्नापूर, मिनघरी, वासेरा, शिवणी, कुक्कुडहेटी, डोंगरगाव, वाढोणा व इतर परिसरात दोन ते चार दिवसांचे शंकरपट भरायचे. पट पाहण्यासाठी बैलगाड्या सजवून तर संपूर्ण पट चांगला दिसावा यासाठी तणसाचे भट्टे भरून न्यायचे. त्यावर बसून शंकरपटाचा आनंद लुटायचे. यासोबतच प्रत्येक गावात नाटक, तमाशा, गोंधळ आदी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे रात्रभर शेतकऱ्यांसह नागरिकांना यातून मनोरंजनाची संधी उपलब्ध व्हायची. शंकरपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी परिसरामध्ये नाटकांची मोठी मागणी आहे. काही भागात व्यावसायिक नाटके सुरू झाली असून या नाटकांना रसिकांची चांगलीच गर्दी होत आहे. क्रांतिनायक, चिंधीबाजार, निजला का राजहंस माझा, अहंकार, गीता गाती ज्ञानेश्वर, जय जय गौरीशंकर, अरे माणसा माणसा, रमाई, अंकुर, निराधार हा पुत्र धरतीचा, कसोटी कुंकवाची, आई तुझं लेकरू अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोरंजन होणार असले तरी शंकरटापासून यावर्षी मात्र पटप्रेमींना मुकावे लागणार आहे.याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता शंकरपटावर बंदी असून याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. आतापर्यंत कुणालाही शंकरपटाची मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)शंकरपट आहे सांस्कृतिक ओळखकाही शेतकऱ्यांच्या बैलजोड्या इतक्या प्रसिद्ध होत असत की त्यांच्या बैलजोडीसोबत शर्यत लावण्यास इतर शेतकरी धजत नव्हते. परिसरातील रत्नापूर येथील काशिनाथ गहाणे, नवरगाव येथील आडकू गहाणे, धर्मा पा. बोरकर, विठोबा घुगूस्कर, देलनवाडी येथील सांबाजी लांजेवार, दादा पा. बोरकर, मसाजी डोंगरवार, नवरगाव येथील सोमाजी चनबनवार, वासेरा येथील आडकु बोरकर, अंतरगाव येथील नामा ठिकरे, रत्नापूर येथील अर्जुन लोधे हे शेतकरी हजारो रुपयांच्या बैलजोड्या केवळ पटासाठी बारमाही पोसायचे. नवरगाव येथील नीळकंठ हरबाजी निनावे यांनी स्वत:च्या शेतीची जागा देलनवाडी या प्रसिद्ध शंकरपटासाठी दान केली. पटामध्ये धावणाऱ्या बैलांच्या हालचालीवरून त्यांचा चेंडू, खराडी, चंद्रया, राज्या, वाघ्या, कुबड्या अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जायचा.