शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम राजेश बारसागडे सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात ...

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम

राजेश बारसागडे

सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात अजूनही शेतीच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही धान्याच्या पेरणीपासून तर घरात उत्पन्नाची साठवणूक करण्यापर्यंत शेतकरी कित्येक काळापासून बैलबंडीचाच उपयोग करीत आले आहे. मात्र अलिकडील शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याचा मार्गांवर आहे.

शेतीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून शेतीचे पारंपरिक अवजारे मागे पडून नवनवीन यांत्रिक उपकरणे, मशिनरीज येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा ती स्वीकारणे सुरु केले आहे. आणि शेतीमध्ये आता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पूर्वी पेरणीपूर्व मशागती पासून मालाची वाहतूक करून घरात साठवणूक करण्यापर्यंत बैलबंडीचाच उपयोग केला जात असे. परंतु अलिकडे घरोघरी ट्रॅक्टर आले असून ट्रॅक्टरचा शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. परिणामी बैलबंडीचे महत्त्व कमी झालेला आहे. मागील काही वर्षांपूर्वी गहू, हरभरा आदी पिकांची सुगी झाल्यानंतर घरी नेण्यासाठी बैलबंडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे.

बॉक्स

अशी होती परंपरा

धान्याने भरलेली बैलबंडी शेतकऱ्यांच्या अंगणात आली की बळीराजा व बैलबंडीचे औक्षवण केल्या जात असे. त्यानंतर औक्षवण केलेल्या ताटात शेतकरी मूठभर धान्य टाकीत असत. मगच कुठे शेतमाल घरात साठविला जात असे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद दरवळत असे. मात्र आता या वैज्ञानिक युगात मळणी यंत्राच्या सहाय्याने सुगी करून धान्य ठेवले जाते. आणि शेतमाल ट्रॅक्‍टरद्वारा मजुरांच्या साहाय्याने थेट घरी आणला जाऊ लागला आहे.. त्यामुळे औक्षवण करण्याची पारंपरिक पद्धतच बंद पडली आहे..

बॉक्स

मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलबंडी

आजघडीला ग्रामीण भागातील काही मोजक्याच सामान्य शेतकऱ्यांकडे बैलबंडी उरली असून बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री व ट्रॅक्टरचा मार्ग अवलंबिला आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात बोअर मारल्यामुळे उन्हाळी पीक सुद्धा शेतकरी घेऊ लागले आहेत. आणि धान कटाई व चुराईसाठी यंत्राचाच वापर करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही थोड्या काळातच बैलबंडी कालबाह्य होण्याचे चित्र दिसू लागले आहेत.