शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम राजेश बारसागडे सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात ...

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम

राजेश बारसागडे

सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात अजूनही शेतीच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही धान्याच्या पेरणीपासून तर घरात उत्पन्नाची साठवणूक करण्यापर्यंत शेतकरी कित्येक काळापासून बैलबंडीचाच उपयोग करीत आले आहे. मात्र अलिकडील शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याचा मार्गांवर आहे.

शेतीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून शेतीचे पारंपरिक अवजारे मागे पडून नवनवीन यांत्रिक उपकरणे, मशिनरीज येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा ती स्वीकारणे सुरु केले आहे. आणि शेतीमध्ये आता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पूर्वी पेरणीपूर्व मशागती पासून मालाची वाहतूक करून घरात साठवणूक करण्यापर्यंत बैलबंडीचाच उपयोग केला जात असे. परंतु अलिकडे घरोघरी ट्रॅक्टर आले असून ट्रॅक्टरचा शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. परिणामी बैलबंडीचे महत्त्व कमी झालेला आहे. मागील काही वर्षांपूर्वी गहू, हरभरा आदी पिकांची सुगी झाल्यानंतर घरी नेण्यासाठी बैलबंडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे.

बॉक्स

अशी होती परंपरा

धान्याने भरलेली बैलबंडी शेतकऱ्यांच्या अंगणात आली की बळीराजा व बैलबंडीचे औक्षवण केल्या जात असे. त्यानंतर औक्षवण केलेल्या ताटात शेतकरी मूठभर धान्य टाकीत असत. मगच कुठे शेतमाल घरात साठविला जात असे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद दरवळत असे. मात्र आता या वैज्ञानिक युगात मळणी यंत्राच्या सहाय्याने सुगी करून धान्य ठेवले जाते. आणि शेतमाल ट्रॅक्‍टरद्वारा मजुरांच्या साहाय्याने थेट घरी आणला जाऊ लागला आहे.. त्यामुळे औक्षवण करण्याची पारंपरिक पद्धतच बंद पडली आहे..

बॉक्स

मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलबंडी

आजघडीला ग्रामीण भागातील काही मोजक्याच सामान्य शेतकऱ्यांकडे बैलबंडी उरली असून बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री व ट्रॅक्टरचा मार्ग अवलंबिला आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात बोअर मारल्यामुळे उन्हाळी पीक सुद्धा शेतकरी घेऊ लागले आहेत. आणि धान कटाई व चुराईसाठी यंत्राचाच वापर करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही थोड्या काळातच बैलबंडी कालबाह्य होण्याचे चित्र दिसू लागले आहेत.