शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम राजेश बारसागडे सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात ...

ट्रॅक्टरने घेतली जागा : यांत्रिकीकरणाचा परिणाम

राजेश बारसागडे

सावरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि बहुतेक ग्रामीण भागात अजूनही शेतीच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही धान्याच्या पेरणीपासून तर घरात उत्पन्नाची साठवणूक करण्यापर्यंत शेतकरी कित्येक काळापासून बैलबंडीचाच उपयोग करीत आले आहे. मात्र अलिकडील शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने शेतकऱ्यांची बैलबंडी नामशेष होण्याचा मार्गांवर आहे.

शेतीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून शेतीचे पारंपरिक अवजारे मागे पडून नवनवीन यांत्रिक उपकरणे, मशिनरीज येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा ती स्वीकारणे सुरु केले आहे. आणि शेतीमध्ये आता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पूर्वी पेरणीपूर्व मशागती पासून मालाची वाहतूक करून घरात साठवणूक करण्यापर्यंत बैलबंडीचाच उपयोग केला जात असे. परंतु अलिकडे घरोघरी ट्रॅक्टर आले असून ट्रॅक्टरचा शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. परिणामी बैलबंडीचे महत्त्व कमी झालेला आहे. मागील काही वर्षांपूर्वी गहू, हरभरा आदी पिकांची सुगी झाल्यानंतर घरी नेण्यासाठी बैलबंडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे.

बॉक्स

अशी होती परंपरा

धान्याने भरलेली बैलबंडी शेतकऱ्यांच्या अंगणात आली की बळीराजा व बैलबंडीचे औक्षवण केल्या जात असे. त्यानंतर औक्षवण केलेल्या ताटात शेतकरी मूठभर धान्य टाकीत असत. मगच कुठे शेतमाल घरात साठविला जात असे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद दरवळत असे. मात्र आता या वैज्ञानिक युगात मळणी यंत्राच्या सहाय्याने सुगी करून धान्य ठेवले जाते. आणि शेतमाल ट्रॅक्‍टरद्वारा मजुरांच्या साहाय्याने थेट घरी आणला जाऊ लागला आहे.. त्यामुळे औक्षवण करण्याची पारंपरिक पद्धतच बंद पडली आहे..

बॉक्स

मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलबंडी

आजघडीला ग्रामीण भागातील काही मोजक्याच सामान्य शेतकऱ्यांकडे बैलबंडी उरली असून बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री व ट्रॅक्टरचा मार्ग अवलंबिला आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात बोअर मारल्यामुळे उन्हाळी पीक सुद्धा शेतकरी घेऊ लागले आहेत. आणि धान कटाई व चुराईसाठी यंत्राचाच वापर करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही थोड्या काळातच बैलबंडी कालबाह्य होण्याचे चित्र दिसू लागले आहेत.