शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

तहसीलवर शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:33 IST

पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा,...

मागणी : वनविभागाची दंडेली थांबवानागभीड : पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा, यासाठी तालुक्यातील बोंड येथील जवळपास ७० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना साकडे घातले.बोंड येथील जवळपास ७० ते ८० शेतकरी २००५ व त्या अगोदरपासून वन्यप्राप्त जागेत अतिक्रमण करून वहिवाट करीत आहेत. या अतिक्रमित जमिनीस ग्राम वनहक्क समिती बोंड यांच्याकडून मान्यता मिळावी, यासाठी ग्रामसभेच्या ठरावासह वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.आता हंगाम सुरू होताच या शेतकऱ्यांनी या जमिनीवर पेरणीचे काम सुरू करताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मज्जाव केला. या सर्व शेतकऱ्यांनी १८ जून रोजी बोंड येथील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली. यानंतर बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर धडक देवून वनविभागाची दंडेली थांबविण्याची मागणी केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन तहसीलदार समीर माने, तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा रामटेके यांना चर्चेसाठी बोलावून चर्चा केली असता ३१ लोकांचे अतिक्रमण अनधिकृत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आमचे अतिक्रमण अधिकृत करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषण करणार, असे शेतकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)