शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST

चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे दिवसेंदिवस शेती करणे कठीण जात आहे. त्यातच आता मजूर? मिळत नसल्याची ...

चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे दिवसेंदिवस शेती करणे कठीण जात आहे. त्यातच आता मजूर? मिळत नसल्याची भर पडली आहे. यंत्राच्या माध्यमातून शेती केली जात असली तरी काही कामांसाठी मजुराची गरज असते. मजुरी वाढवूनही मजूर? शेतकामाला येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे मजूर? देता का मजूर?, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान उत्पादनासह, सोयाबीन, कापूस, तूर, गहू, चना, आदी पिके घेतली जाते. मात्र, शेतकामापेक्षा इतर कामे बरे म्हणून मजूर शेतीच्या कामास येण्यास नकार देत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून बघायला मिळत आहे. सध्या पुरुष शेतमजुराला ३०० ते ३५० रुपये, तसेच फवारणी, जड कामासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे, तर महिला मजुरांना १५० रुपयांपर्यंत मजुरी आहे. हंगामाच्या दिवसांमध्ये मजुरांची टंचाई असते. अशावेळी यामध्ये वाढ होत आहे. विशेषत: धान, सोयाबीन, गहू, आदी काढणीच्या कामामध्ये मजूर गुत्ता पद्धतीने कामे घेतात. यामध्ये ते यापेक्षाही अधिक मजुरी पाडतात. या सर्वांमध्ये कापूस वेचनीच्या कामामध्ये अंगावरचे काम असल्यामुळे मजूर अधिक मजुरी पाडतात. मागील वर्षापर्यंत कापूस वेचनीत किलोमागे पाच रुपये मोजावे लागत होते. मात्र, यावर्षी बोंडअळीमुळे कापूस वेचणीच होत नसल्याने १० रुपये किलो देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेती करणे दिवसेंदिवस कठीण १. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच हंगामानुसारच हाताला काम मिळते. त्यामुळे शेतकामाची मजुरी वाढणे गरजेचे आहे. मजुरी जास्त पडावी यासाठी गुत्ता पद्धतीने काम केल्यास अधिक मजुरी पडते. मात्र, अतिरिक्त काम करावे लागत असल्याचे गोवरी येथी प्रदीप लोहे म्हणाले.

२. धान उत्पादक क्षेत्रामध्ये धान रोवणी, तसेच कापणी झाल्यानंतर हाताला काम नसते. त्यामुळे या काळात कमावून वर्षभर पैसा पुरवावा लागतो. दिवसभर राबूनही हातात १५० ते २०० रुपये पडते.

मिंथुर येथील देविदास काटवले यांचे म्हणणे आहे.

३. यांत्रिकीपद्धतीने शेती केली जात असली तरी मजुरांची गरज असतेच. बी-बियाणे खते, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहे. त्यातच मजूरही मिळत नाही. त्यामुळे पेरणी, तसेच काढणीच्या वेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा मजुरांअभावी पेरणी उशिरा होत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडत असल्याचे कोरपना येथील शेतकरी अरुण जेनेकर यांचे म्हणणे आहे.

मजुरीचा दर

पाच वर्षांपूर्वी

पुरुष मजूर २०० रुपये

महिला मजूर १०० रुपये

यावर्षीचे दर

पुरुष मजूर ३५० रुपये

महिला मजूर १५० रुपये

यंत्राद्वारे होणारी कामे

वखरणी, नांगरणी, डवरणी, पेरणी, मळणी, कापणी, तण काढणी, पाट काढणे, गादी वाफा, फवारणी

--

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

मागील काही वर्षांमध्ये मजुरांची जागा कृषी यंत्रांनी घेतली आहे. बहुतांश कामे यंत्रांद्वारे केली जात आहे. पूर्वी ज्या कामासाठी आठ ते दहा मजूर लागायचे त्याच कामासाठी आता दोन ते तीन मजूर लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाची बचत, तसेच काम अधिक वेगाने होत आहे.