शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकरी व शेतमजुरांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:56 IST

उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य किसान सभा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.दिवसेंदिवस शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. उद्योगपतीना एन. पी. एच्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जात आहे. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती नाकारण्यात आली. शेतकºयांच्या पीकाला योग्य हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्यात यावी,.जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जबरानज्योत धारकांवर लावण्यात आलेल्या तीन पिढयांची जाचक अट रद्द करावी, जबरानजोत धारकांच्या जमिनीचे व घराचे पट्टे त्वरीत वाटप करावे, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगारांना पाच हजार रुपये पेंशन देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी करून सातबार कोरा करावा, फेटाळलेल्या दाव्यांची फेरचौकशी करावी, प्रत्येक गावाचे जंगलवरील सामूहिक वनहक्काचे दावे मंजूर करावे, शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शहरातील अतिक्रमीत झोपडपट्टी धारकांना पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी पार पडलेल्या किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपुलवार, राज्य उपाध्यक्ष प्रा. नामदेव कन्नाके, अरूण वनकर, जिल्हा सचिव राजू गैनवार, नारायण जांभुळे यांनी संबोधित केले. त्यानंतर कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव नखाते, महेंद्र भिमटे, श्रीधर वाढई, संतोष दास, ममता भिमटे, उज्ज्वला बावणकर, मोरेश्वर डांगे, प्रकाश नागपुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.