शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी संघटनेचा झेंडा

By admin | Updated: February 16, 2016 01:13 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार

राजुरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार समितीवर आपला झेंडा फडकावला आहे.सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सहकारी संस्था मतदार संघामध्ये एकूण १४ उमेदवार उभे होते. त्यामधुन ७ उमेदवार निवडावयाचे होते. सातही उमेदवार शेतकरी संघटनेचे निवडून आलेत. विजयी उमेदवारामध्ये बाळा इसनकर १०९, हरिश्चंद्र आवारी १०८, नारायण गड्डमवार १२०, नानाजी पोटे - ११०, रमेश बोबडे १२८, हरिदास बोकुटे ११४, दत्ता हिंगाणे याांना १११ मते मिळाली. या गटामधील काँग्रेस- भाजपा युतीचे पराभूत उमेदवार विजय उपरे ८४, श्यामराव कोटनाके ८७, शंकर गोनेलवार ८८, सुनील देशपांडे ९२, विनायक देशमुख ९५, दिलीप वांढरे ९७, प्रभाकर साळवे ९१ मते घेतली. सहकारी संस्था मतदार संघातून शेतकरी संघटनेचे विजयी उमेदवार मीरा काळे ११९, शंकुतला देरकर ११३, पराभूत उमेदवार- नंदा गेडाम, माया भोयर, मतदार संघ गटामधून शेतकरी संघटनेचे कवडू पोटे यांनी काँग्रेस-भाजपा युतीच्या आबाजी ढुमने यांना ५ मतांनी पराभूत केले. कवडू पोटे यांना ११८ मते तर आबाजी ढुमणे यांना १०३ मते मिळाली.शेतकरी संघटनेचे पुंजाराम बरडे यांनी काँग्रेसचे साईनाथ बतकमवार यांना ७ मतांनी पराभूत केले. साईनाथ बतकमवार यांना १०७ तर पुंजाराम बरडे यांना ११३ मते मिळाली.ग्रामपंचायत मतदार संघातून काँग्रेस-भाजपा - शिवसेना युतीचे उमेदवार अविनाश जेनेकर २७३, संतोष झाडे २६७, किसन टेकाम २५९, मारोती सिडाम २८२, चार उमेदवार विजयी झाले. शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार संतोष डोंगे १७०, दादा वडस्कर १७०, आनंद चहारे १९७, प्रकाश वेडमे १७२ हे आहेत.व्यापारी अडते मतदार संघातून शेतकरी संघटनेचे मनमोहन सारडा ७७, विठ्ठल पाल ५९ विजयी झाले. पराभूत उमेदवार सतीश कोमरवेलीवार १७, विष्णुप्रसाद नावंधर २१, महेश रेगुंडवार ११, रामअवतार सोनी ४, हमाल मापारी मतदार संघातून शेतकरी संघटनेचे राजू पहानपटे यांनी काँग्रेसच्या सय्यद सखावत अली यांना १ मतानी पराभूत केले. राजू पहानपटे यांना १३ मते तर सय्यद सखावत अली यांना १२ मते प्राप्त झाली. विजयानंतर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रभाकर दिवे, नगरसेवक प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष रामगिरवार, मधुकर चिंचोलकर, घनशाम हिंगाणे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजपा युतीला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालावर भविष्यातील राजकीय आराखडे बांधले जात आहे. (शहर प्रतिनिधी)