शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:24 IST

Chandrapur News, Tiger राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला.

ठळक मुद्देआतापर्यंत दहा जणांचा बळीहल्लेखोर वाघाला जेरबंद न केल्याने वन विभागाविरूद्ध संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला. मृतकाचे नाव मारोती पेंदोर असे आहे. आतापर्यंत दहा लोकांचा बळी जावूनही हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खांबाडा येथील मारोती पेंदोर यांची गावाला लागूनच शेती आहे. सोमवारी दुपारी शेतीच्या जवळच असलेल्या कक्ष क्रमांक १७८ मध्ये पाळीव जनावरांना चराईसाठी नेले होते. परंतु सायंकाळी घरी परत आले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबाने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोधशोध सुरू केली असता वाघाच्या हल्ल्यात मारोती पेंदोर यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

वाघाने हल्ला केल्यानंतर त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग खाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर राजुऱ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वातील पथकाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. तपासणीनंतर कुटुंबीयांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला. ऐन शेतीच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.हल्लेखोर वाघाचा चार महिन्यांपासून धुमाकूळराजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हल्लेखोर वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या कालावधीत वाघाने नऊ जणांचा बळी घेतला. सोमवारी खांबाडा येथील मारोती पेंदोर या शेतकऱ्याला ठार केल्याने परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची जागली सोडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांवर वाघाचा हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठांना अहवालाद्वारे देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे नागरिकांनी शेतीची कामे करताना काळजी घेतली पाहिजे.-विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा

टॅग्स :Tigerवाघ