शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:24 IST

Chandrapur News, Tiger राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला.

ठळक मुद्देआतापर्यंत दहा जणांचा बळीहल्लेखोर वाघाला जेरबंद न केल्याने वन विभागाविरूद्ध संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात सोमवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला. मृतकाचे नाव मारोती पेंदोर असे आहे. आतापर्यंत दहा लोकांचा बळी जावूनही हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खांबाडा येथील मारोती पेंदोर यांची गावाला लागूनच शेती आहे. सोमवारी दुपारी शेतीच्या जवळच असलेल्या कक्ष क्रमांक १७८ मध्ये पाळीव जनावरांना चराईसाठी नेले होते. परंतु सायंकाळी घरी परत आले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबाने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोधशोध सुरू केली असता वाघाच्या हल्ल्यात मारोती पेंदोर यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

वाघाने हल्ला केल्यानंतर त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग खाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर राजुऱ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वातील पथकाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. तपासणीनंतर कुटुंबीयांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला. ऐन शेतीच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.हल्लेखोर वाघाचा चार महिन्यांपासून धुमाकूळराजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हल्लेखोर वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या कालावधीत वाघाने नऊ जणांचा बळी घेतला. सोमवारी खांबाडा येथील मारोती पेंदोर या शेतकऱ्याला ठार केल्याने परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीची जागली सोडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांवर वाघाचा हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठांना अहवालाद्वारे देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे नागरिकांनी शेतीची कामे करताना काळजी घेतली पाहिजे.-विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा

टॅग्स :Tigerवाघ