शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

विमा मोबदल्यासाठी शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:17 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात पीक विम्याच्या सुधारित आदेशामध्ये अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा : खरीप हंगामावर आर्थिक अडचणींचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात पीक विम्याच्या सुधारित आदेशामध्ये अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू आहेत.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ४२ पानांचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये काही ठळक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने उंबरठा उत्पन्नाचा समावेश आहे. पीक विम्याची मदत जाहीर करताना उंबरठा उत्पन्नाचा मूळ आधार धरला जाणार आहे. हे उंबरठा उत्पन्न पीक विमा काढल्यानंतर जाहीर केले जाणार आहे असा उल्लेख पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आदेशात केला आहे. विमा या अटीने कंपनीचा फायदा होणार आहे. उंबरठा उत्पादन जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहे.उंबरठा उत्पादनाचे स्वरूपमागील सात वर्षांमधील एकूण उत्पन्नापैकी पाच वर्षांतील चांगल्या उत्पन्नाची सरासरी काढणे आणि ती ग्राह्य धरणे या पद्धतीला उंबरठा उत्पन्न म्हटल्या जाते. या पद्धतीत यंदाच्या खरीप हंगामातील निश्चित प्लॉटमध्ये आलेले उत्पन्न काढले जाते. तर शेतकºयांना विम्याची मदत दिली जाते. विम्याच्या मदतीसाठी वापरण्यात आलेले पाच वर्षांचे समीकरणही कंपनी हिताचेच आहे, असा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचे उत्पन्न त्यात ग्राह्य धरले तरच शेतकऱ्यांना मदत मिळते. मात्र पाच वर्षांची सरासरी काढल्याने मदत मिळत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.उंबरठा उत्पन्न जाहीर करावेउंबरठा उत्पन्न पाच वर्षांच्या उत्पन्नावरुन जाहीर केले जाते. कुठल्या कुठल्या पिकाचे उबंरठा उत्पन्न किती, याची माहिती कृषी विभागाला असते. सदर माहिती विमा उतरविण्यापूर्वी जाहीर करावा. यातून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते.अल्प उत्पादनामुळे कर्जाचा डोंगरशेतीवरच खर्च आता वाढला आहे. त्यातून निघणारे उत्पादन कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाही. बदलती कौटुंबिक स्थितीदेखील शेती क्षेत्रासाठी समस्या ठरू लागली आहे. कर्जबाजारी होण्याची कारणे तालुकानिहाय वेगवेगळी आहेत. पण, शेतीतून निघणारे कमी उत्पादन (नापिकी) हे कारण साधारणत: सर्वच तालुक्यांना लागू होते.तालुका कक्ष सुरू करावेपीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कंपनीचेच हित जोपासल्यास आरोप होत आहे. उंबरठा उत्पादन जाहीर केले तर थेट शेतकºयांना फायदा होणार आहे. यातून शेतकºयांच्या पिकाचे संरक्षण होऊन मदत मिळेल. मात्र अध्यादेशात शेतकरी हित जोपासण्यात आले नाही. परिणामी विमा कंपन्यांचे तालुका कक्ष सुरू करण्याची मागणी केली जात आहे.