शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

विमा मोबदल्यासाठी शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:17 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात पीक विम्याच्या सुधारित आदेशामध्ये अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा : खरीप हंगामावर आर्थिक अडचणींचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात पीक विम्याच्या सुधारित आदेशामध्ये अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू आहेत.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ४२ पानांचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये काही ठळक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने उंबरठा उत्पन्नाचा समावेश आहे. पीक विम्याची मदत जाहीर करताना उंबरठा उत्पन्नाचा मूळ आधार धरला जाणार आहे. हे उंबरठा उत्पन्न पीक विमा काढल्यानंतर जाहीर केले जाणार आहे असा उल्लेख पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आदेशात केला आहे. विमा या अटीने कंपनीचा फायदा होणार आहे. उंबरठा उत्पादन जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहे.उंबरठा उत्पादनाचे स्वरूपमागील सात वर्षांमधील एकूण उत्पन्नापैकी पाच वर्षांतील चांगल्या उत्पन्नाची सरासरी काढणे आणि ती ग्राह्य धरणे या पद्धतीला उंबरठा उत्पन्न म्हटल्या जाते. या पद्धतीत यंदाच्या खरीप हंगामातील निश्चित प्लॉटमध्ये आलेले उत्पन्न काढले जाते. तर शेतकºयांना विम्याची मदत दिली जाते. विम्याच्या मदतीसाठी वापरण्यात आलेले पाच वर्षांचे समीकरणही कंपनी हिताचेच आहे, असा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचे उत्पन्न त्यात ग्राह्य धरले तरच शेतकऱ्यांना मदत मिळते. मात्र पाच वर्षांची सरासरी काढल्याने मदत मिळत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.उंबरठा उत्पन्न जाहीर करावेउंबरठा उत्पन्न पाच वर्षांच्या उत्पन्नावरुन जाहीर केले जाते. कुठल्या कुठल्या पिकाचे उबंरठा उत्पन्न किती, याची माहिती कृषी विभागाला असते. सदर माहिती विमा उतरविण्यापूर्वी जाहीर करावा. यातून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते.अल्प उत्पादनामुळे कर्जाचा डोंगरशेतीवरच खर्च आता वाढला आहे. त्यातून निघणारे उत्पादन कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाही. बदलती कौटुंबिक स्थितीदेखील शेती क्षेत्रासाठी समस्या ठरू लागली आहे. कर्जबाजारी होण्याची कारणे तालुकानिहाय वेगवेगळी आहेत. पण, शेतीतून निघणारे कमी उत्पादन (नापिकी) हे कारण साधारणत: सर्वच तालुक्यांना लागू होते.तालुका कक्ष सुरू करावेपीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कंपनीचेच हित जोपासल्यास आरोप होत आहे. उंबरठा उत्पादन जाहीर केले तर थेट शेतकºयांना फायदा होणार आहे. यातून शेतकºयांच्या पिकाचे संरक्षण होऊन मदत मिळेल. मात्र अध्यादेशात शेतकरी हित जोपासण्यात आले नाही. परिणामी विमा कंपन्यांचे तालुका कक्ष सुरू करण्याची मागणी केली जात आहे.