शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:57 IST

मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : हंगाम सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्या योजनेत १ लाख ५० हजारांच्या खाली असलेले कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखांच्यावर असलेल्या कर्जाकरिता एकमूस्त रक्कम भरून दीड लाखांची कर्जमाफी मिळवून घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार काही शेतकºयांनी वरील रक्कम भरून कर्जमाफीची प्रतिक्षा सुरू केली. मधल्या काळात आलेल्या ग्रीन याद्यांमध्ये अत्यल्प कमी शेतकऱ्यांची नावे आली आहे. परंतु, त्यांनाही कर्ज मिळाले नाही. शेती हंगामाला हळूहळू प्रारंभ होत आहे. बँकेकडून कर्ज मिळेल या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांना आता कर्ज मिळण्याची कोणतीही आशा दिसत नसल्याने त्या शेतकऱ्यांनी उधारीवर बियाणे व खते मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात यश येताना दिसत नसल्यामुळे सावकाराच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सन २०१७ मध्ये कृषी कर्ज उचलेल्या ज्या शेतकऱ्यांना २०१८ च्या हंगामात कर्ज मिळाले नाही. पुनर्गठण करण्याची मागणी आहे.सुनावणीनंतरही नाही कार्यवाहीज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. त्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्जाच्या छायांकित प्रतिसह अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. अर्जावर सुनावणी झाली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्जमाफी होणार की नाही तसेच नव्या हंगामात पैशाची जुळवाजळव कुठून करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.