शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:33 IST

वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे.

ठळक मुद्देवेकोलिचे ढिगारे : सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगोवरी : वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे. या जंगलात दबा धरून बसणाºया वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, मानोली, बाबापूर, कढोली, गोयेगाव, अंतरगाव येथील बराचसा भाग वेकोलि परिसराला लागून आहे. कोळसा उत्खनन केल्यानंतर वेकोलि प्रशासनाकडून ही माती शेताजवळच टाकत आहे. त्यामुळे अनेक गावांच्या शेताजवळ टेकडी तयार झाली. सातरी, चनाखा, विहिरगाव, पंचाळा परिसराला जंगल अगदी लागून असल्याने या ठिकाणी नेहमी वन्यप्राण्यांचे कळप आढळतात. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आधीच हतबल झाला आहे. बोंडअळीने शेती उद्ध्वस्त झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन मोठी घट झाली आहे.बोंड अळीने शेतकºयांचा कापूस पूर्णत: वाया गेला. दरम्यान, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे नुकसान झाले. रब्बी हंगामात भाजीपाला व अन्य पिके शेतात उभी असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला. यातही शेतीचे नुकसान होत आहे. शेतकºयांना आयुष्यभर संघर्षच करावा लागत आहे. शेतकºयांच्या नशिबी संघर्षाचे जगणेच आले आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही शेतीची माती होत आहे सरकार शेतामालाला भाव देत नाही. निसर्ग शेतकºयांच्या साथ देत नाही. वन्यप्राणी शेतातील पीक उद्धवस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मचाणीवरुन हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहे.पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे. मात्र, वेकोलिच्या ढिगाºयामुळे वन्यप्राण्यांना अगदी शेताजवळच आश्रय मिळाला. जंगलाचा परिसर दूर असूनही केवळ वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वेकोलिने शेताजवळ माती टाकणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्ध्वस्त केले जात आहे. शेताच्या जवळच वेकोलिने मातीचे ढिगारे तयार केले. त्यावर झुडपी जंगल तयार झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी रब्बी पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान सुरू असल्याने शेतात जागली करावी लागत आहे.- तुषार चौथले, शेतकरी, पांचाळा