शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:33 IST

वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे.

ठळक मुद्देवेकोलिचे ढिगारे : सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगोवरी : वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे. या जंगलात दबा धरून बसणाºया वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, मानोली, बाबापूर, कढोली, गोयेगाव, अंतरगाव येथील बराचसा भाग वेकोलि परिसराला लागून आहे. कोळसा उत्खनन केल्यानंतर वेकोलि प्रशासनाकडून ही माती शेताजवळच टाकत आहे. त्यामुळे अनेक गावांच्या शेताजवळ टेकडी तयार झाली. सातरी, चनाखा, विहिरगाव, पंचाळा परिसराला जंगल अगदी लागून असल्याने या ठिकाणी नेहमी वन्यप्राण्यांचे कळप आढळतात. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आधीच हतबल झाला आहे. बोंडअळीने शेती उद्ध्वस्त झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन मोठी घट झाली आहे.बोंड अळीने शेतकºयांचा कापूस पूर्णत: वाया गेला. दरम्यान, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे नुकसान झाले. रब्बी हंगामात भाजीपाला व अन्य पिके शेतात उभी असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला. यातही शेतीचे नुकसान होत आहे. शेतकºयांना आयुष्यभर संघर्षच करावा लागत आहे. शेतकºयांच्या नशिबी संघर्षाचे जगणेच आले आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही शेतीची माती होत आहे सरकार शेतामालाला भाव देत नाही. निसर्ग शेतकºयांच्या साथ देत नाही. वन्यप्राणी शेतातील पीक उद्धवस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मचाणीवरुन हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहे.पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे. मात्र, वेकोलिच्या ढिगाºयामुळे वन्यप्राण्यांना अगदी शेताजवळच आश्रय मिळाला. जंगलाचा परिसर दूर असूनही केवळ वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वेकोलिने शेताजवळ माती टाकणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्ध्वस्त केले जात आहे. शेताच्या जवळच वेकोलिने मातीचे ढिगारे तयार केले. त्यावर झुडपी जंगल तयार झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी रब्बी पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान सुरू असल्याने शेतात जागली करावी लागत आहे.- तुषार चौथले, शेतकरी, पांचाळा