शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रंगीबेरंगी साड्यांनी नटले शेतशिवार; वन्यप्राण्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:06 IST

राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तापमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुके हे सर्व असतानाच वन्यप्राण्यांपासून शेताची होणारी नासधूस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केला असून रंगीबेरंगी साड्यांनी शेतशिवार सजवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड बघायला मिळत आहे.महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधीअवकाळी पाऊस तर कधी ढगाळी वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कापूस, सोयाबिन, हरभरा उत्पादक ढगाळ वातावरणामुळे चिंतेत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच चार दिवसापूर्वी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे धुक्याची दाट चादर पसरत आहे. हे सर्व संकट असतानाच वन्यप्राण्यांमुळेही शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून हरभरा तसेच गहु पिकाच्या संरक्षमासाठी शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटकायंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांचे लागवड केली. मात्र वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि वातावरणातील बदलामुळे ते त्रस्त झाले आहे. शेतकरी शेती जगविण्यासाठी फवारणीसाठी मोठा खर्च करीत आहेत. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करुन पिके जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की, काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :agricultureशेती