शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: April 8, 2016 00:58 IST

शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष : तलावाच्या पाळीवर घरांचे बांधकामसावली : शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अंदाजे ५६ एकर जमीन या तलावात आहे. आजूबाजूचे शेतकरीदेखील तलावाच्या जागेचा वापर करुन हळूहळू अतिक्रमण करीत आहे. तलावाच्या पाळीवर घरे होत आहेत. पाळी शेजारी गुरांढोरासाठी गोठ्याचे बांधकाम कच्चे स्वरूपात झालेले दिसते. नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस तलावच दिसणार नाही.शहराला लागून असणारा हा गावतलाव मध्यभागी आहे. या तलावाला वैभवाची परंपरा लाभली आहे. महिला-पुरुष मंडळी दरवर्षी गौरी विसर्जन, गणेश, शारदा विसर्जन याच तलावात करतात. शहरातील असंख्य महिला याच तलावात कपडे धुतात. बैलांना पाणी व आंघोळीसाठीही याच तलावाचा वापर केला जातो. पूर्वी शंकरपट याच तलावात भरत होते. मोठ्या प्रमाणात बैलांची व माणसांची गर्दी राहायची. वैभवसंपन्न असणाऱ्या हा तलाव आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे.या तलावाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना व्हायचा. पण आता अनेक जमिनी अकृषक होवून तेथे ले-आऊट पाडले आहेत. जिथे हिरवेगार पिक दिसायचे, तिथे सिमेंटच्या इमारती दिसतात. काही मोजक्या शेतकऱ्यांना आता या तलावाचा फायदा होतो. गोसीखुर्दचे पाणी मिळणार असल्याने हा तलाव उपेक्षितच राहणार आहे. या अगोदरच्या ग्रामपंचायत कमेटीने अनेकदा ठराव घेऊन शासकीय कार्यालये, निवासस्थाने तलावाच्या वरच्या भागात झाली पाहिजे, क्रीडांगण झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. शासकीय कार्यालये, निवासस्थाने यासाठी सावली नगरात जागेची कमतरता आहे. गाव तलावाच्या जागेचा वापर केल्यास शासकीय कार्यालये व निवासस्थाने शहरातच होवू शकतात. यासाठी नगरपंचायतने पुढाकार घ्यावा, अशी सावली नगरवासीयांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)