शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मारहाणीनंतर कुटुंबीयांचे पलायन

By admin | Updated: June 25, 2014 23:41 IST

तालुक्यातील राळापेठ येथे ताप व डेंग्यु सदृश रोगाने थैमान घालून पाच जणांचा बळी घेतला. या गावातील दूषित पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या नाल्या यामुळे त्यांचा बळी

राळापेठ येथील घटना : जादुटोण्याच्या संशयगोंडपिपरी : तालुक्यातील राळापेठ येथे ताप व डेंग्यु सदृश रोगाने थैमान घालून पाच जणांचा बळी घेतला. या गावातील दूषित पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या नाल्या यामुळे त्यांचा बळी गेल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मात्र येथील नागरिकांचे समाधान झाले नाही. काही नागरिकांनी अंधश्रद्धेतून जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करीत एका कुटुंबास बेदम मारहाण केली. त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने अन्यायग्रस्त कुटुंबाने गाव सोडून पलायन केल्याची चर्चा आहे. मागील एक महिन्यापूर्वी राळापेठ येथे डेंग्यु सदृश व तापाने पाच जण दगावले. यानतंर रोग नियंत्रणासाठी विविध ठिकाणांहून आरोग्य अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र मृत्यू सत्र थांबविण्यात विलंब झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीसह आमदार सुभाष धोटे व खासदार हंसराज अहीर यांनी आरोग्य विभागास चांगलेच धारेवर धरले. एका पाठोपाठ सलग पाच जणांचा बळी गेल्याने धास्तावलेल्या राळापेठ वासियांना काय करावे, हे सुचत नव्हते. त्यानंतर येथील काही नागरिकांनी अंधश्रद्धेतून गावात जादूटोणा झाल्याचा संशय व्यक्त केला. बाहेरगावाहून मांत्रीकास पाचारण केले. राळापेठ येथील ग्रामस्थांच्या आग्रहावरून मांत्रीक गावात दाखल होताच त्याने पूजा अर्चनेसह प्रत्येक घरातून नैवद्य शिजवून आणण्यास सांगितल्याचे समजते. त्यापैकी केवळ पुरुषोत्तम सिडाम यांच्या घरुन नैवद्य आला नसल्याचे लक्षात येताच मांत्रीकाच्या सांगण्यानुसार गावकऱ्यांचा त्याच्यावर संशय बळावला आणि गावातील नागरिक व महिलांनी पुरुषोत्तम सिडाम याच्यासह त्याची पत्नी मुलास माराहाण केल्याचे समजते.या घटनेसंदर्भात राळापेठ येथील काही ग्रामस्थांना विचारले असता राळापेठ येथे घडलेल्या मृत्यूसत्रामागे सिडाम कुटुंबच कारणीभूत असून कुटुंबियांना चोप दिल्यानंतर सिडाम कुटुंबियांनी गावातून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी)