शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

वर्ष लोटूनही अवैध दारूविक्री रोखण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:21 IST

राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते

महिला वर्ग त्रस्त : प्रभावी अंमलबजावणीची मागणीराजुरा : राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: ग्रामीण भागात तर दारूबंदीच्या निर्णयाने महिलांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला होता. परंतु महिनाभर होत नाही तोच अवैध दारूविक्रीने सर्वत्र जिल्हाभर थैमान घातले. ही दारूबंदी प्रभावी राबवावी, यासाठी सामाजीक संस्था, महिला मंडळे व लोकप्रतिनिधीकडून पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पण दारूबंदीला एक वर्षाचा काळ लोटूनही यावर लगाम लावण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राजुरा तालुका हा आधीपासून मागासलेला आहे. या तालुक्यात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कामानंतर मद्य पिणाऱ्यांची लक्षणीय संख्या ही राजुरा शहरात बघायला मिळत होती. पण दारूबंदीच्या निर्णयानंतर हे प्रमाण अंशत: नाहीसे, होईल अशी जनसामान्याची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा दारूबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही अपेक्षाभंग होत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.राजुरा शहरात सध्या ‘फोन करा, दारू मिळवा’ अशी स्थिती निर्माण झाली असुन दारूची घरपोच सुविधा सुरू आहे. या अवैध दारूविक्रीच्या धंद्यात मोठ्यासह विद्यार्थी व महिलाही मोठ्या संख्येने गुंतल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अधिकाऱ्यांनी दिलेला टार्गेट पूर्ण करण्याच्या व प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तुटपुंज्या कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे. आजही राजुरा तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून दारूची सर्रास वाहतूक होत असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे.दारूबंदी निर्णयानंतर तेलंगणा राज्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून लक्कडकोट येथे तपासणी नाका उभारण्यात आला होता. त्या नाक्यावर तेलंगणा राज्यातून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांनी स्थानिक प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाच्या अभावाने उभारण्यात आलेला तपासणी नाका काढण्यात आला. यामुळे दिवसरात्र सर्रास दुचाकी तर कधी चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)