शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

अड्याळ टेकडीचा चेहरामोहरा बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.

ठळक मुद्देवारसा नागभीड तालुक्याचा

नागभीड : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्षे मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर निघाले. संबंध महाराष्ट्र व देशात दादाच्या समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवर त्यांनी विशेष लक्ष पुरविले. टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक गाव निर्माण केले. त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा महान आणि आदर्श समाजसेवकाचे ८ जून २००६ रोजी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर झाले. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे शिवशंकर पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपल्यात काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली त्या ठिकाणी दादाच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थेने दोन कोटी रूपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादाच्या समाधीस्थळांचे बांधकाम हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर राजस्थानातूनच मागविण्यात आले होते. या समाधी स्थळाव्यतिरिक्त आणखी इतर विविध बांधकामे करण्यात आली. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल जलाशय, पुष्पवेली आणि विविध प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आता सेवास्थळ झाली आहे. टेकडीवरी विलोभनीय बांधकामाने सौंदर्यात भर टाकली. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत तिथे सभागृह बांधण्यात आले. आणखी लहान-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामाने अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीवर सुरू असलेले विविध उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारी आहेत.गीताचार्य तुकाराम दादानी राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून शेकडो विधायक कामे केली. सामान्यांच्या हितासाठी झटले. ग्रामगीतेतील विचार आचरणात आणला. लोकांचे प्रबोधन करून चांगल्या मार्गाला लावले.-घनश्याम नवघडे