शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे विजयी उमेदवारांंच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य लहान पक्षांनीही यंदाच्या निवडणुकीत ...

ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाही. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य लहान पक्षांनीही यंदाच्या निवडणुकीत पडद्यामागून सूत्रे हलविली. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांनीही बहुसंख्य ग्रामपंचायतींवर आपणच वर्चस्व मिळविल्याचा दावा केला. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झालेल्या यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत तसेच जवळपास सम प्रमाणात जागा जिंकणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या कमीच आहे. नियमानुसार एकूण सदस्य संख्या ११ पैकी एका पॅनलचे ७ सदस्य निवडून आल्यास बहुमत मिळते. यातील एका सक्षम सदस्याची सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवड होते. मात्र, ११ सदस्यांपैकी एका पॅनेलचे ६ आणि दुसऱ्या पॅनेलचे ५ सदस्य विजयी झाल्यास सरपंचपदासाठी घोडेबाजार होऊ शकतो. जिल्ह्यात अशा ग्रामपंचायतींची संख्या बरीच आहे. यातून एकमेकांच्या पॅनेलमधील सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. सदस्यांना प्रलोभने दाखवली जातात. सरपंद पदाचा अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत अज्ञातस्थळी नेण्याचे प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीतही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मतदानाचे तीन पर्याय

सरपंचपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर अशावेळी हजर सदस्यांचे मतदान घेण्याचा नियम आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित सदस्यांचे आवाजी, हात वर करून किंवा गोपनीय चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात. मतमोजणी झाल्यानंतर जास्त मते मिळवणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

जिल्हा प्रशासनाची आज बैठक

जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुकीचा अहवाल लवकरच साद करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण ३० दिवसात जाहीर करण्याची मुदत आहे. मात्र, येत्या १० दिवसातच अंतिम निर्णय होऊ शकतो. ग्रा. पं. निवडणुकीसंदर्भात बुधवारी जिल्हा प्रशासनाची बैठक होणार आहे.