शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2017 00:27 IST

पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे.

दुबार पेरणीचे संकट : बा पावसा का कोपलास ?लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे. परंतु पाऊस शेतकऱ्यांना हुलकावणी देत निघून जात आहे. आज-उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांना ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पाहिलेले स्वप्न मातीमोल झाले असून पावसाअभावी पेरण्या हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे त्याच्या काळजाची धडधड वाढायला लागली असून अनेकांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.कृषीप्रधान देशातील शेती आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकऱ्यांनी जगावे की मरावे एवढी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचे दिवस आज संपले आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतो आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुऱ्या पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे.आता शेतकऱ्यांजवळ पुन्हा पेरणी करण्यासाठी एक छदामही पैसा शिल्लक उरलेला नाही. शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना आतून पोखरतो आहे. पावसाअभावी शिवार अजूनही हिरवेगार झाले नाही. जुलै महिन्याचा आठवडा संपून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस शेतकऱ्यांवर का रूसून बसला, हे कळायला मार्ग नाही. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबविली आहे. पावसाअभावी जगाचा पोशिंदाच चिंतातूर झाला असून त्याच्या काळजाची धडधड वाढली आहे.बहुतांश शेती कोरडवाहूजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. निसर्गाचे पाणी हेच शेतीचे जीवनामृत आहे. परंतु निसर्ग आज लहरीपणासारखा वागायला लागल्याने निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती बिनभरवशाची झाली आहे.काहींच्या अद्याप पेरण्याच नाहीयंदा खरीप हंगामात एकूण चार लाख ३८ हजार २०२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात येईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या टाकल्या आहेत. जवळजवळ निम्म्या शेतकऱ्यांनी अद्यापही पेरण्या केलेल्या नाही. पाऊस प्रत्येक नक्षत्रात दगा देत असल्याने शेतकऱ्यांनी हिंमत खचत चालली आहे. ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांच्या पेरण्या पावसाअभावी नष्ट होत आहे.