शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

By admin | Updated: August 13, 2015 01:49 IST

आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच बेजार : १३ हजार हेक्टर जमिनीवरील रोवणी खोळंबलीब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत. पाऊस आज पडेल या आशेत सर्वच जनता आसुसलेली आहे. आकाशात दररोज मेघ दाटून येतात. परंतु पावसाचा थंगपत्ता नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुकावासीयांचे डोळे आजही आभाळाकडे लागले असल्याचे विदारक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.कधी नव्हे एवढी पाण्याबाबतची भीषणत: यावर्षी या तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात एकूण रोवणी क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त २४६२ हेक्टर शेतजमिनीवर रोवणी झाल्या आहेत. ज्या रोवणी झाल्या त्या मोटारपंपच्या साहाय्याने करवून घेतल्या गेल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर खऱ्या अर्थाने अजूनही रोवणीची कामे झालीच नाही. आतापर्यंत यावर्षी या तालुक्यात फक्त ५० मि.मी. पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी या कालखंडात ९० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षी रोवणीची कामे पूर्णत: पार पडली होती. आता मात्र परिस्थिती बिकट होत चालली आहे. शेतकरी वर्ग हातावर हात ठेवून रोज आभाळाकडे टक लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बोड्या, नाले, तलाव, पाण्याविना अपूर्ण आहेत. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट तालुक्यात निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा, कधी उन्ह तर कधी बादल अशी परिस्थिती रोज निर्माण होत आहे. दररोज एखाद्या वेळी आकाशात ढग दाटून येतात. परंतु पाऊस निघून जात असल्याने सर्वांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती पुन्हा काही काळ राहिली तर सर्वत्र हा:हाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस अतिशय कमी पडल्याने आरोग्य व इतर साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पावसाची सर्वांना अपेक्षा आहे. हे स्वप्न हवेत विरणार काय, असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे. (तालुुका प्रतिनिधी)