शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

By admin | Updated: August 13, 2015 01:49 IST

आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच बेजार : १३ हजार हेक्टर जमिनीवरील रोवणी खोळंबलीब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत. पाऊस आज पडेल या आशेत सर्वच जनता आसुसलेली आहे. आकाशात दररोज मेघ दाटून येतात. परंतु पावसाचा थंगपत्ता नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुकावासीयांचे डोळे आजही आभाळाकडे लागले असल्याचे विदारक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.कधी नव्हे एवढी पाण्याबाबतची भीषणत: यावर्षी या तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात एकूण रोवणी क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त २४६२ हेक्टर शेतजमिनीवर रोवणी झाल्या आहेत. ज्या रोवणी झाल्या त्या मोटारपंपच्या साहाय्याने करवून घेतल्या गेल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर खऱ्या अर्थाने अजूनही रोवणीची कामे झालीच नाही. आतापर्यंत यावर्षी या तालुक्यात फक्त ५० मि.मी. पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी या कालखंडात ९० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षी रोवणीची कामे पूर्णत: पार पडली होती. आता मात्र परिस्थिती बिकट होत चालली आहे. शेतकरी वर्ग हातावर हात ठेवून रोज आभाळाकडे टक लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बोड्या, नाले, तलाव, पाण्याविना अपूर्ण आहेत. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट तालुक्यात निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा, कधी उन्ह तर कधी बादल अशी परिस्थिती रोज निर्माण होत आहे. दररोज एखाद्या वेळी आकाशात ढग दाटून येतात. परंतु पाऊस निघून जात असल्याने सर्वांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती पुन्हा काही काळ राहिली तर सर्वत्र हा:हाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस अतिशय कमी पडल्याने आरोग्य व इतर साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पावसाची सर्वांना अपेक्षा आहे. हे स्वप्न हवेत विरणार काय, असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे. (तालुुका प्रतिनिधी)