शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

By admin | Updated: August 13, 2015 01:49 IST

आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच बेजार : १३ हजार हेक्टर जमिनीवरील रोवणी खोळंबलीब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत. पाऊस आज पडेल या आशेत सर्वच जनता आसुसलेली आहे. आकाशात दररोज मेघ दाटून येतात. परंतु पावसाचा थंगपत्ता नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुकावासीयांचे डोळे आजही आभाळाकडे लागले असल्याचे विदारक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.कधी नव्हे एवढी पाण्याबाबतची भीषणत: यावर्षी या तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात एकूण रोवणी क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त २४६२ हेक्टर शेतजमिनीवर रोवणी झाल्या आहेत. ज्या रोवणी झाल्या त्या मोटारपंपच्या साहाय्याने करवून घेतल्या गेल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर खऱ्या अर्थाने अजूनही रोवणीची कामे झालीच नाही. आतापर्यंत यावर्षी या तालुक्यात फक्त ५० मि.मी. पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी या कालखंडात ९० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षी रोवणीची कामे पूर्णत: पार पडली होती. आता मात्र परिस्थिती बिकट होत चालली आहे. शेतकरी वर्ग हातावर हात ठेवून रोज आभाळाकडे टक लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बोड्या, नाले, तलाव, पाण्याविना अपूर्ण आहेत. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट तालुक्यात निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा, कधी उन्ह तर कधी बादल अशी परिस्थिती रोज निर्माण होत आहे. दररोज एखाद्या वेळी आकाशात ढग दाटून येतात. परंतु पाऊस निघून जात असल्याने सर्वांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती पुन्हा काही काळ राहिली तर सर्वत्र हा:हाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस अतिशय कमी पडल्याने आरोग्य व इतर साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पावसाची सर्वांना अपेक्षा आहे. हे स्वप्न हवेत विरणार काय, असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे. (तालुुका प्रतिनिधी)