शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

विषय शिक्षकांच्या निर्मितीने शिक्षक ठरणार अतिरिक्त

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षकाची नव्याने पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षकाची नव्याने पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. विषय शिक्षक पदे निर्मितीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने विरोध दर्शविला आहे.प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाने वेळोवेळी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आदींमध्ये सुधारणा केली. सध्याच्या स्थितीत इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता १२ वी आणि शिक्षक अध्यापन पदविका आहे. मात्र, उच्च प्राथमिक स्तरावर मान्य होणाऱ्या शिक्षकापैकी २५ टक्के शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पदवी आणि शिक्षणशास्त्रातील पदविका, पदवी अशी आहे.मात्र, शासनाने २३ फेब्रुवारी २०१३ च्या शासननिर्णयान्वये उच्च प्राथमिक स्तरावर २५ टक्के पदाऐवजी १०० टक्के शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पदवी आणि शिक्षणशास्त्रातील पदवी अशी केली आहे. पूर्वीच्या पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षक ही पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे आता भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या प्रमुख विषयांसाठी स्वतंत्र पदे निर्माण केली आहेत.बहुतांश जिल्हा परिषद शाळांत इयत्ता सहावी व सातवीच्या तुकड्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे दोन इयत्ता मिळून ७० पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक व ७० च्या वर तीन शिक्षक देण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ७० च्या आत आहेत. त्यामुळे दोनच शिक्षक निर्धारण होणार आहेत. एक पद सामाजिकशास्त्र व दुसरे पद विज्ञान व गणित विषयासाठी, तर भाषेसाठी स्वतंत्र शिक्षक मिळणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता सहावी ते सातवीसाठी वर्ग दोन व शिक्षक दोन, अशी स्थिती बहुतांश शाळेत दिसणार आहे.जिल्ह्यात विज्ञान पदवीधर शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे विज्ञान विषयाच्या जागा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार आहेत. विषयाची सक्ती असल्यामुळे भविष्यात सरळसेवा भरतीने विज्ञान विषयाच्या शिक्षकाची जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भरती प्रक्रियेचा परिणाम कार्यरत शिक्षकांवर होऊन मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे पदवीधर सहाय्यक शिक्षकाऐवजी पदवीधर विषय शिक्षक पदे निर्मितीला प्राथमिक शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. (शहर प्रतिनिधी)