शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

केंद्र सरकारमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST

राजुरा : केंद्रातील शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना ...

राजुरा : केंद्रातील शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. या काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहे. आतापर्यंत ३००पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने एकामागून एक सरकारी संस्थांचे खासगीकरण करीत आहेत. कामगार कायद्यांतील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत, या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे काहीही देणे-घेणे नाही. कोरोनासारख्या महामारीच्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून त्यांचे कंबरडे मोडले असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

राजुरा येथे तहसील कार्यालयाजवळ उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, उपसभापती मंगेश गुरुनुले, पंचायत समिती सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदा जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, न.प. सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दीपा करमनकर, संध्या चांदेकर, गीता रोहने, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष नंदकिशोर वाढई, मोहसीन अली बंदाली, धोत्रा, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, सर्वानंद वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, शहराध्यक्ष रफिक शेख, रामभाऊ ढुमणे, ॲड. रामभाऊ देवईकर विविध कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.