शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:44 IST

केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचारमंथन बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. सरकारचे लोककल्याणकारी निर्णय, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच भाजपाचे संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भाजपा पक्षाची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगरसेवक राहुल पावडे, हिरामण खोब्रागडे, रामपाल सिंह, अनील फुलझेले, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांसाठी, ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व विकास प्रक्रिया जनतेपर्यंत पोहोचवत जनता तसेच भाजपा यातील सुसंवाद अधिक प्रशस्त करावा. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पाटीर्ची प्रतिमा जनमानसात अधिक ओजस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. .यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, तीन राज्यात भाजपा सत्तेत येऊ शकली नाही. काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणारी लोकसभेची निवडणूक जिंकत भारतीय जनता पार्टी पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आशिष देवतळे यांनी सी.एम. चषक स्पर्धेचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी केले.यावेळी भद्रावती तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत निर्वाचित झालेल्या भाजपा सदस्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.