शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:44 IST

केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचारमंथन बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. सरकारचे लोककल्याणकारी निर्णय, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच भाजपाचे संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भाजपा पक्षाची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगरसेवक राहुल पावडे, हिरामण खोब्रागडे, रामपाल सिंह, अनील फुलझेले, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांसाठी, ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व विकास प्रक्रिया जनतेपर्यंत पोहोचवत जनता तसेच भाजपा यातील सुसंवाद अधिक प्रशस्त करावा. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पाटीर्ची प्रतिमा जनमानसात अधिक ओजस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. .यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, तीन राज्यात भाजपा सत्तेत येऊ शकली नाही. काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणारी लोकसभेची निवडणूक जिंकत भारतीय जनता पार्टी पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आशिष देवतळे यांनी सी.एम. चषक स्पर्धेचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी केले.यावेळी भद्रावती तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत निर्वाचित झालेल्या भाजपा सदस्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.