शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राष्ट्रसंतांचे विश्वव्यापक साहित्य घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: January 11, 2016 01:11 IST

राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो.

बाबुराव वाग्दरकर : पिंपळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटनप्रकाश काळे  पिंपळगाव(कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे समग्र साहित्य विश्वव्यापक असून ते घराघरांत पोहचवण्याचे कार्य कृतियुक्त कार्यकर्त्यांनी स्वयंसेवा तत्वावर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपळगाव येथे आयोजित १४ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात संमेलनाध्यक्ष बाबुराव वाग्दरकर यांनी केले.राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीद्वारा आयोजित संमेलनाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श गाव राजगडचे चंदू पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संजय तिळसम्रुतकर, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ चंदनखेडे, सरपंच विजय मरस्कोल्हे, तंटामुक्त अध्यक्ष वामनराव गनफडे, पोलीस पाटील प्रशांत नागपूरे, सुनील बोढाले, माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्डे, झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. कार्यक्रमाची भूमिका विषद करताना ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर म्हणाले, राष्ट्रसंताच्या विचारातून या संमेलनाची निर्मिती झाली असून या माध्यमातून समाज जागृती व आदर्श गावे निर्माण होताना कार्याकर्ते घडत आहे. ही विशेषता असल्याचे सांगितले. यावेळी विचार साहित्य परिषदेद्वारे देण्यात येणारे चैतन्य युवा पुरस्काराचे मानकरी बिबी येथील कवी अविनाश पोईनकर, संध्या पोडे (माजरी), दिलीप डाखरे (नांदेपेरा), अभय घटे (राजुरा), विलास चौधरी (पेंढरी), संजय आवारी (कृष्णानपूर) यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक विलास उगे यांनी केले. संचालन अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर तर आभार गुणवंत खोरगडे यांनी मानले. कायक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.