शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कंपन्यांकडून आदिवासींची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:18 IST

तीन दशकांपूर्वी गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट उद्योग कंपनी उभारण्यात आली. यासाठी कोलाम आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, योग्य आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेवून निवेदन सादर केले. कंपनीने न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.

ठळक मुद्देमोबदल्यापासून वंचित : न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तीन दशकांपूर्वी गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट उद्योग कंपनी उभारण्यात आली. यासाठी कोलाम आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, योग्य आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेवून निवेदन सादर केले. कंपनीने न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.माणिकगड कंपनीने १९८४-८५ दरम्यान चूनखडी उत्खननाकरिता वनविभागाची २३८.९६ हेक्टर तर कुसुंबी येथील कोलाम आदिवासीं ६३.६२ हेक्टर अधिग्रहित केली. पण, कोलाम आदिवासींना मोबदला दिला नाही. हा समाज दऱ्याखोºयात राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. जमिनीचा मोबदला न देणे, विस्थापीत अनुदानापासून वंचित ठेवणे व पूनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कोलाम समाजावर झाला आहे. कंपनीने मालकी हक्काच्या जमिनी आदिवासींकडून बळकावून चुनखडीचे खनन सुरू केले. अन्यायग्रस्त आदिवासी दहा वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. पण कंपनीकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भीमा सिडाम, मारोती येडमे, भाऊराव कन्नाके, बापूराव जुमनाके, पग्गु आत्राम, शंकर सिडाम आदींनी निवेदनातून केला आहे. कंपनीकडून कशा पद्धतीने शोषण होते, याचे स्वरूप शेतकºयांनी नमूद केले. जमिनीचा मोबदला न देता मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवल्याने जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. कुटुंबातील एकाही व्यक्तीला कंपनीने रोजगार दिला नाही. कंपनीने बळाचा वापर करून दहशत निर्माण करीत आहे. ९ लाख ८४ हजार रुपयांमध्ये ६३.६२ हेक्टर जमीन व गावठाण घराचा मोबदला ५२ कुटुंबांना दिल्याचे कंपनी भासवत आहे. मात्र अशी कोणतीही कार्यवाही महसूल वभूसंपादन पूनर्वसन विभागाकडून करण्यात आलेनाही. १९८४ ते २००१ पर्यंत लिजवर जमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र यावर आक्षेप असताना नुतनीकरण करण्यात आले. त्यामुळे विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन आ. धानोरकर यांनी शेतकºयांना दिले. सरकारने कोलाम आदिवासींना न्याय मिळवून द्यावा अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रमोद मगरे, आबीद अली, जिल्हा शिवसेना प्रमुख सतिश भिवगडे, जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेश नायडू, युवा सेना प्रमुख सचिन भोयर, प्रकाश खनके, श्रीनु बलकी, भारत सलाम, संजय सोयाम, संदीप भोयर, संदीप लोहे, भोजराज झाडे तसेच विनोद जुमडे, रमेश डाखरे, मदन पेंदाने, महादेव पेंदोर उपस्थित होते.