शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांकडून आदिवासींची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:18 IST

तीन दशकांपूर्वी गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट उद्योग कंपनी उभारण्यात आली. यासाठी कोलाम आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, योग्य आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेवून निवेदन सादर केले. कंपनीने न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.

ठळक मुद्देमोबदल्यापासून वंचित : न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तीन दशकांपूर्वी गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट उद्योग कंपनी उभारण्यात आली. यासाठी कोलाम आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, योग्य आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेवून निवेदन सादर केले. कंपनीने न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.माणिकगड कंपनीने १९८४-८५ दरम्यान चूनखडी उत्खननाकरिता वनविभागाची २३८.९६ हेक्टर तर कुसुंबी येथील कोलाम आदिवासीं ६३.६२ हेक्टर अधिग्रहित केली. पण, कोलाम आदिवासींना मोबदला दिला नाही. हा समाज दऱ्याखोºयात राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. जमिनीचा मोबदला न देणे, विस्थापीत अनुदानापासून वंचित ठेवणे व पूनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कोलाम समाजावर झाला आहे. कंपनीने मालकी हक्काच्या जमिनी आदिवासींकडून बळकावून चुनखडीचे खनन सुरू केले. अन्यायग्रस्त आदिवासी दहा वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. पण कंपनीकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भीमा सिडाम, मारोती येडमे, भाऊराव कन्नाके, बापूराव जुमनाके, पग्गु आत्राम, शंकर सिडाम आदींनी निवेदनातून केला आहे. कंपनीकडून कशा पद्धतीने शोषण होते, याचे स्वरूप शेतकºयांनी नमूद केले. जमिनीचा मोबदला न देता मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवल्याने जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. कुटुंबातील एकाही व्यक्तीला कंपनीने रोजगार दिला नाही. कंपनीने बळाचा वापर करून दहशत निर्माण करीत आहे. ९ लाख ८४ हजार रुपयांमध्ये ६३.६२ हेक्टर जमीन व गावठाण घराचा मोबदला ५२ कुटुंबांना दिल्याचे कंपनी भासवत आहे. मात्र अशी कोणतीही कार्यवाही महसूल वभूसंपादन पूनर्वसन विभागाकडून करण्यात आलेनाही. १९८४ ते २००१ पर्यंत लिजवर जमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र यावर आक्षेप असताना नुतनीकरण करण्यात आले. त्यामुळे विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन आ. धानोरकर यांनी शेतकºयांना दिले. सरकारने कोलाम आदिवासींना न्याय मिळवून द्यावा अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रमोद मगरे, आबीद अली, जिल्हा शिवसेना प्रमुख सतिश भिवगडे, जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेश नायडू, युवा सेना प्रमुख सचिन भोयर, प्रकाश खनके, श्रीनु बलकी, भारत सलाम, संजय सोयाम, संदीप भोयर, संदीप लोहे, भोजराज झाडे तसेच विनोद जुमडे, रमेश डाखरे, मदन पेंदाने, महादेव पेंदोर उपस्थित होते.