शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

खर्च वाढला, उत्पन्न घसरले !

By admin | Updated: July 29, 2015 00:48 IST

शासनाने यावर्षी कापसाला हमीभाव म्हणून ४१०० रुपये जाहीत केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ५० रुपयाची वाढ शेतकऱ्यांना देण्यात आली.

लोकमत विशेषनांदाफाटा : शासनाने यावर्षी कापसाला हमीभाव म्हणून ४१०० रुपये जाहीत केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ५० रुपयाची वाढ शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची पिवळणूक होणार असून उत्पादन खर्चापेक्षा कमी नफा शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची लागवड केली. मात्र गेल्या २० ते २५ दिवसात पावसाने हजेरी न लावल्याने पिकाची वाढ पाहिजे तशी झाली नाही. यावर्षी कापसाची एक पिशवी साधारणत: शेतकऱ्यांना ८५० ते ९०० रुपयात खरेदी करावी लागली. यातही किटनाशके, मजुरांची मजुरी आणि मशागत व खताचा विचार करता, एवढ्या कमी हमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना तोट्याचेच ठरणार आहे. एका एकरामागे जवळपास सात ते आठ हजार रुपये उत्पादन खर्च असताना शासन कवडीमोल भाव ठरवून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. तर यावर्षी सोयाबीन पिकाला केवळ १०० रुपये हमी भाव अधिक देण्यात आला आहे. एकीकडे सोयाबीनची एक पिशवी घेण्यासाठी २८०० ते ३००० रुपये मोजावे लागतात आणि दुसरीकडे केवळ ३००० रुपयात सोयाबीन विकावे लागणार की काय, अशी परिस्थिती हमी भावामुळे निर्माण झाली आहे. बियाणांचे, खताचे भाव गगणाला भिडले असताना मालाचे भाव मात्र वाढलेले दिसत नाही. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. मात्र शासन शेतकऱ्यांना आता केराची टोपली दाखवित असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. विदर्भात कापसाचे ४० हजारहून अधिक जमिनीवर उत्पादन घेतले जाते. यातही याच विदर्भात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक असून कापूस या मुख्य पिकाला भाव मिळत नसल्याने कापसाची शेती करणे तोट्यात येत आहे. शासनाच्या अत्यल्प हमीभावामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र नाराजी पसरलेली दिसून येत आहे. (वार्ताहर)