शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खर्च वाढला, उत्पन्न घसरले !

By admin | Updated: July 29, 2015 00:48 IST

शासनाने यावर्षी कापसाला हमीभाव म्हणून ४१०० रुपये जाहीत केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ५० रुपयाची वाढ शेतकऱ्यांना देण्यात आली.

लोकमत विशेषनांदाफाटा : शासनाने यावर्षी कापसाला हमीभाव म्हणून ४१०० रुपये जाहीत केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ५० रुपयाची वाढ शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची पिवळणूक होणार असून उत्पादन खर्चापेक्षा कमी नफा शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची लागवड केली. मात्र गेल्या २० ते २५ दिवसात पावसाने हजेरी न लावल्याने पिकाची वाढ पाहिजे तशी झाली नाही. यावर्षी कापसाची एक पिशवी साधारणत: शेतकऱ्यांना ८५० ते ९०० रुपयात खरेदी करावी लागली. यातही किटनाशके, मजुरांची मजुरी आणि मशागत व खताचा विचार करता, एवढ्या कमी हमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना तोट्याचेच ठरणार आहे. एका एकरामागे जवळपास सात ते आठ हजार रुपये उत्पादन खर्च असताना शासन कवडीमोल भाव ठरवून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. तर यावर्षी सोयाबीन पिकाला केवळ १०० रुपये हमी भाव अधिक देण्यात आला आहे. एकीकडे सोयाबीनची एक पिशवी घेण्यासाठी २८०० ते ३००० रुपये मोजावे लागतात आणि दुसरीकडे केवळ ३००० रुपयात सोयाबीन विकावे लागणार की काय, अशी परिस्थिती हमी भावामुळे निर्माण झाली आहे. बियाणांचे, खताचे भाव गगणाला भिडले असताना मालाचे भाव मात्र वाढलेले दिसत नाही. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. मात्र शासन शेतकऱ्यांना आता केराची टोपली दाखवित असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. विदर्भात कापसाचे ४० हजारहून अधिक जमिनीवर उत्पादन घेतले जाते. यातही याच विदर्भात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक असून कापूस या मुख्य पिकाला भाव मिळत नसल्याने कापसाची शेती करणे तोट्यात येत आहे. शासनाच्या अत्यल्प हमीभावामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र नाराजी पसरलेली दिसून येत आहे. (वार्ताहर)