शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरस स्वयंसिद्धा महोत्सवातून ७० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

By admin | Updated: February 28, 2017 00:36 IST

विदर्भात प्रथमच चंद्रपूर होणाऱ्या विभागीय स्तरावरील सरस महोत्सव ‘स्वंयसिध्दा-२०१७’ च्या आयोजनातून प्रशासनाला ७० लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची...

एम. देवेंदर सिंह : सहा जिल्ह्यातून २५६ बचत गटांचा सहभागचंद्रपूर : विदर्भात प्रथमच चंद्रपूर होणाऱ्या विभागीय स्तरावरील सरस महोत्सव ‘स्वंयसिध्दा-२०१७’ च्या आयोजनातून प्रशासनाला ७० लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भातील सहा जिल्ह्यातील २५६ महिला बचतगट या महोत्सवात सहभागी होणार असून २ ते ६ मार्च या काळात हे आयोजन स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे पार पडत आहे. राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, आणि चंद्रपूर व गडचिरोलीची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वंयसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री हा यामागील हेतू आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातील २५६ महिला स्वंयसहाय्यता समुहांचे स्टॉल राहणार आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ११० बचत गटांना निमंत्रित करण्यात आले आहे. ५०० ते ६०० महिला या महोत्सवासाठी मुक्कामी येणार असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था ओम भवन आणि बुरडकर सभागृहात करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून विभागप्रमुख आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या त्यात समावेश आहे. मागील वर्षी जिल्हास्तरीय महोत्सवातून ३५ लाख रूपयांचे उत्पादन झाले होते. या वर्षी हे उद्दीष्ट दुपटीने वाढविण्यात आले आहे. कॅशलेस व्यवहाराचे महत्व लक्षात घेता पेटीएम आणि भीम अ‍ॅपची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व सहभागी बचत गटांनाही या कॅशलेस व्यवहाराच्या व्यवस्थेत सहभागी केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महोत्सवाचे उदघाटन २ मार्चला सकाळी १०.३० वाजता होणार असून दररोज सांयकाळी ७ वाजतापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २ मार्चला गजल नवाज भीमराव पांचाळे यांचा कार्यक्रम, ३ मार्चला कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे नृत्य, ४ मार्चला ‘असा नवरा नको ग बाई’ हे नाटक आणि ५ मार्चला ओडिसी नृत्यांगना बिंदू जुनेजा यांच्या नृत्याचा कार्यक्रम असे नियोजन आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)पॉस मशिन्सचा तुटवडाकॅशलेस व्यवहाराचे महत्व लक्षात घेवून बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँकेकडे जिल्हा परिषदेने २५० पॉस मशिन्सची मागणी केली होती. मात्र मशिन्सचा तुटवडा असल्याने त्या देण्यात बँकांच्या व्यवस्थापनाने असमर्थता दर्शविली. या मशिन्स अस्थायी स्वरूपात देता येणे शक्य नसल्याने विकत घेणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे भीम अ‍ॅप आणि पेटीएमच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केवळ २ हजार २०० बचतगट सक्रियजिल्ह्यात सुमारे १० हजाराच्या जवळपास बचत गट आहेत. असे असले तरी अनेक बचत गट निव्वळ कागदावर आहेत. फक्त २ हजार २०० बचतगटच सक्रिय असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. अन्य बचत गट केवळ व्याजाने रकमा देण्याचे काम करतात, त्यामुळे बचत गटांची सावकारी ग्रामीण भागात सुरू असल्याचे यावेळी पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. असे होत असेल तर बचत गट स्थापनेच्या उद्देशाचा अर्थ काय, अशी विचारणाही पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.