शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 04:51 IST

महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.

राजेश मडावी चंद्रपूर : महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.राज्याच्या एकूण वीज उत्पादनात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा वाटा सर्वाधिक आहे. उद्योग, वाणिज्यिक व घरगुती वीज वापरण्याचे दरडोई प्रमाण वाढल्याने राज्यात अतिरिक्ति वीज उत्पादनाची दिवसेंदिवस गरज भासत आहे. त्यामुळे या केंद्रातील प्रती ५०० मे. वॅ. क्षमतेच्या आठ आणि नऊ या दोन संचाच्या विस्तारीकरणासाठी उद्योग व ऊर्जा विभागाने राज्य वितरण निर्मिती कंपनीला मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पुरवठ्यातील फरक, बाजार मूल्यांकनात होणारा बदल, कामासाठी लागणाºया साधसामुग्रीची किंमत व निर्देशांकात झालेली वाढ आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा विलंब आदी कारणांमुळे खर्चात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सुधारित खर्च व वाढीव भागभांडवलासाठी मंजुरी देण्याचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित होता.दरम्यान, १५ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. मात्र, मंजुरीसंदर्भात विचार झाला नव्हता. परिणामी, मूळ प्रकल्प खर्च, महानिर्मितीच्या प्रस्तावाप्रमाणे सुधारित प्रकल्प खर्च, वाढीव खर्च आणि प्रत्यक्षात व्यापारी तत्त्वावर सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी होणाºया अतिरिक्त सुधारित खर्चाबाबत कामालीचा संभ्रम निर्माण झाला होता.> वीज उत्पादनात अव्वलचंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ व नऊ क्रमांकाच्या संच विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यास राज्यातील विजेची समस्या कायमची दूर होणार आहे. वेकोलिने कोळसा उत्पादन व आयात धोरणात बदल केल्याने राज्यातील काही औष्णिक केंद्राच्या वीज उत्पादनाला मोठा फ टका बसला आहे. तर खासगी वीज उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदी करताना दर निश्चितीचा प्रश्न सुटला नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे वीज उत्पादन अव्वल ठरले आहे. दोन संचाच्या विस्तारीकरणानंतर वीज उत्पादनात पुन्हा भर पडू शकते.