शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

महाऔष्णिकच्या संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 04:51 IST

महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.

राजेश मडावी चंद्रपूर : महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यानंतर अंदाजित व अतिरिक्त भाग भांडवलासाठी ऊर्जा विभागाने मान्यता दिल्याने संच विस्तारीकरणाचा तिढा सुटला आहे.राज्याच्या एकूण वीज उत्पादनात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा वाटा सर्वाधिक आहे. उद्योग, वाणिज्यिक व घरगुती वीज वापरण्याचे दरडोई प्रमाण वाढल्याने राज्यात अतिरिक्ति वीज उत्पादनाची दिवसेंदिवस गरज भासत आहे. त्यामुळे या केंद्रातील प्रती ५०० मे. वॅ. क्षमतेच्या आठ आणि नऊ या दोन संचाच्या विस्तारीकरणासाठी उद्योग व ऊर्जा विभागाने राज्य वितरण निर्मिती कंपनीला मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पुरवठ्यातील फरक, बाजार मूल्यांकनात होणारा बदल, कामासाठी लागणाºया साधसामुग्रीची किंमत व निर्देशांकात झालेली वाढ आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा विलंब आदी कारणांमुळे खर्चात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सुधारित खर्च व वाढीव भागभांडवलासाठी मंजुरी देण्याचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित होता.दरम्यान, १५ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. मात्र, मंजुरीसंदर्भात विचार झाला नव्हता. परिणामी, मूळ प्रकल्प खर्च, महानिर्मितीच्या प्रस्तावाप्रमाणे सुधारित प्रकल्प खर्च, वाढीव खर्च आणि प्रत्यक्षात व्यापारी तत्त्वावर सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी होणाºया अतिरिक्त सुधारित खर्चाबाबत कामालीचा संभ्रम निर्माण झाला होता.> वीज उत्पादनात अव्वलचंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ व नऊ क्रमांकाच्या संच विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यास राज्यातील विजेची समस्या कायमची दूर होणार आहे. वेकोलिने कोळसा उत्पादन व आयात धोरणात बदल केल्याने राज्यातील काही औष्णिक केंद्राच्या वीज उत्पादनाला मोठा फ टका बसला आहे. तर खासगी वीज उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदी करताना दर निश्चितीचा प्रश्न सुटला नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे वीज उत्पादन अव्वल ठरले आहे. दोन संचाच्या विस्तारीकरणानंतर वीज उत्पादनात पुन्हा भर पडू शकते.