शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो

By admin | Updated: October 14, 2014 23:16 IST

आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार,

दीपक म्हैसेकर : मतदारांना आवाहनचंद्रपूर : आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार, असा विचार करुन मतदानाच्या दिवशी सहलीचा आनंद लुटतो. हे सक्षम लोकशाहीला पूरक नसून मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मतदारांना केले आहे. उद्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान मतदानाच्या रुपाने द्यावे, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यापारी व उद्योजक यांनी सर्व प्रथम मतदान करावे व नंतर आपल्या कामासाठी जावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदानाची टक्केवारी १०० टक्के व्हावी हा संकल्प सर्वांनी करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरी भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. जिल्हा बार असोसिएशनला विनंती करताना, वकील यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांनी मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी म्हटले आहे. उद्योग क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाच्या दिवशी उद्योगातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्हा निवडणूक कार्यालयाने चित्ररथद्वारे मतदार जागृती केली असून हा चित्ररथ गावागावात फिरुन नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासंबंधीचे पोस्टर, बॅनर व घोषवाक्य या चित्ररथावर अंकीत केले आहेत. समाजातील विविध घटकांच्या भेटी घेऊन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर प्रयत्न करीत आहेत. नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कलापथकाचे व पथनाट्याचे कार्यक्रम प्रत्येक विधान मतदार संघात सुरु आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना दिला आहे. शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व ज्येष्ठ नागरिक अशा विविध ठिकाणी सर्वांनी मतदान करावे. १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण, तरुणींनी आपला मतदानाचा पहिला अधिकार अवश्य बजवावा, मतदानाने राष्ट्रीय कार्यात हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येकाने नि:संकोचपणे घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)