शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो

By admin | Updated: October 14, 2014 23:16 IST

आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार,

दीपक म्हैसेकर : मतदारांना आवाहनचंद्रपूर : आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार, असा विचार करुन मतदानाच्या दिवशी सहलीचा आनंद लुटतो. हे सक्षम लोकशाहीला पूरक नसून मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मतदारांना केले आहे. उद्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान मतदानाच्या रुपाने द्यावे, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यापारी व उद्योजक यांनी सर्व प्रथम मतदान करावे व नंतर आपल्या कामासाठी जावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदानाची टक्केवारी १०० टक्के व्हावी हा संकल्प सर्वांनी करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरी भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. जिल्हा बार असोसिएशनला विनंती करताना, वकील यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांनी मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी म्हटले आहे. उद्योग क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाच्या दिवशी उद्योगातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्हा निवडणूक कार्यालयाने चित्ररथद्वारे मतदार जागृती केली असून हा चित्ररथ गावागावात फिरुन नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासंबंधीचे पोस्टर, बॅनर व घोषवाक्य या चित्ररथावर अंकीत केले आहेत. समाजातील विविध घटकांच्या भेटी घेऊन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर प्रयत्न करीत आहेत. नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कलापथकाचे व पथनाट्याचे कार्यक्रम प्रत्येक विधान मतदार संघात सुरु आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना दिला आहे. शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व ज्येष्ठ नागरिक अशा विविध ठिकाणी सर्वांनी मतदान करावे. १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण, तरुणींनी आपला मतदानाचा पहिला अधिकार अवश्य बजवावा, मतदानाने राष्ट्रीय कार्यात हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येकाने नि:संकोचपणे घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)