शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

धानोरा-भोयगाव पुलाचे अस्तित्व धोक्यातअनेक वर्षांत डागडुजीही नाही : प्रवास झाला धोकादायक

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची साधी डागडुजीही झाली नाही. त्यामुळे पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.पुलावर ठिकठिकाणी सिमेंट उखडल्याने सळाखी दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी छोटेमोठे खड्डे दिसत आहे. महाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुलाचे दुरूस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव उमाकांत धांडे यांनी केली आहे.सदर पुल होण्यापूर्वी चंद्रपूरवरून गडचांदूरला जाण्याकरिता राजुरा हा एकमेव मार्ग होता. मात्र हे अंतर जास्त असल्याने तथा या मार्गावरील जड वाहतूक चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा शहराबाहेरून वळविण्याच्या हेतुने वर्धा नदीवर चंद्रपूर तालुक्यातील धानोरा व कोरपना तालुक्यातील भोयगाव दरम्यान पुलाची मागणी करण्यात आली. चंद्रपूरचे तत्कालीन आमदार तथा पालकमंत्री दिवंगत श्यामबाबु वानखेडे यांनी यांच्या पाठपुराव्यानंतर १९९२-९३ च्या सुमारास हा पुल बांधण्यात आला आणि येवून वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या पुलामुळे चंद्रपूर - गडचांदूर हे अंतर बरेच कमी होऊन इंधन व पैशाची बचत तर झालीच शिवाय वर्धा नदी पट्ट्यातील चंद्रपूर, कोरपना आणि राजुरा तालुक्यातील अनेक दुर्गम व अविकसीत राहिलेली गावे परस्परांना जोडल्या जाऊन दळणवळण विकसीत झाले. गडचांदूर या औद्योगिक शहर परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट कारखान्यातील सिमेंटची वाहतूक करणारे अवजड वाहने याच मार्गाने धावतात. बांधकाम विभागाच्यावतीने एकीकडे कोट्यवधीची विकास कामे होत असताना सदर पुलाचे महत्व लक्षात घेता या पुलाची साधी देखभाल दुरूस्तीही होऊ शकली नाही, हे विशेष. काही दिवसांपूर्वी या पुलावरील खड्डयांमुळे दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक दुचाकीस्वार पुलावरून पडून जखमी झाला होता. परिणामी आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. सदर पुलाची पाहणी करून दुरूस्ती करण्याची मागणी उमाकांत धांडे, दीपक पानघाटे, अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, योगेश गोखरे, विनोद वासाडे, विजय वासाडे, राजु गौरकार तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)