शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

धानोरा-भोयगाव पुलाचे अस्तित्व धोक्यातअनेक वर्षांत डागडुजीही नाही : प्रवास झाला धोकादायक

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची साधी डागडुजीही झाली नाही. त्यामुळे पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.पुलावर ठिकठिकाणी सिमेंट उखडल्याने सळाखी दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी छोटेमोठे खड्डे दिसत आहे. महाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुलाचे दुरूस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव उमाकांत धांडे यांनी केली आहे.सदर पुल होण्यापूर्वी चंद्रपूरवरून गडचांदूरला जाण्याकरिता राजुरा हा एकमेव मार्ग होता. मात्र हे अंतर जास्त असल्याने तथा या मार्गावरील जड वाहतूक चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा शहराबाहेरून वळविण्याच्या हेतुने वर्धा नदीवर चंद्रपूर तालुक्यातील धानोरा व कोरपना तालुक्यातील भोयगाव दरम्यान पुलाची मागणी करण्यात आली. चंद्रपूरचे तत्कालीन आमदार तथा पालकमंत्री दिवंगत श्यामबाबु वानखेडे यांनी यांच्या पाठपुराव्यानंतर १९९२-९३ च्या सुमारास हा पुल बांधण्यात आला आणि येवून वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या पुलामुळे चंद्रपूर - गडचांदूर हे अंतर बरेच कमी होऊन इंधन व पैशाची बचत तर झालीच शिवाय वर्धा नदी पट्ट्यातील चंद्रपूर, कोरपना आणि राजुरा तालुक्यातील अनेक दुर्गम व अविकसीत राहिलेली गावे परस्परांना जोडल्या जाऊन दळणवळण विकसीत झाले. गडचांदूर या औद्योगिक शहर परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट कारखान्यातील सिमेंटची वाहतूक करणारे अवजड वाहने याच मार्गाने धावतात. बांधकाम विभागाच्यावतीने एकीकडे कोट्यवधीची विकास कामे होत असताना सदर पुलाचे महत्व लक्षात घेता या पुलाची साधी देखभाल दुरूस्तीही होऊ शकली नाही, हे विशेष. काही दिवसांपूर्वी या पुलावरील खड्डयांमुळे दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक दुचाकीस्वार पुलावरून पडून जखमी झाला होता. परिणामी आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. सदर पुलाची पाहणी करून दुरूस्ती करण्याची मागणी उमाकांत धांडे, दीपक पानघाटे, अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, योगेश गोखरे, विनोद वासाडे, विजय वासाडे, राजु गौरकार तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)